शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७५ कर्मचारी वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनांवर कार्यरत असलेले सी.आर.टी. नियमित आस्थापनेवरील ३५ कर्मचारी गेल्या ४ महिन्यांच्या वेतनापासून ...

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजनांवर कार्यरत असलेले सी.आर.टी. नियमित आस्थापनेवरील ३५ कर्मचारी गेल्या ४ महिन्यांच्या वेतनापासून वंचित आहेत. याच विभागातील ४० कर्मचारी गेले काही महिने निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून या कर्मचाऱ्यांना गेल्या २० वर्षांपासून नियमित वेतनासह निवृत्तिवेतनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यंदा एप्रिल अखेरपर्यंत दोन्हींसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेला नाही.

राज्याच्या पाणी, स्वच्छता विभागाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन यासाठी आवश्यक असलेला निधी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करणारे हे कर्मचारी हक्काच्या पगारापासून यामुळेच वंचित राहिले आहेत.

४ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने दैनंदिन खर्च कसा भागवावा, अशा चिंतेत कर्मचारी सापडले आहेत. जिल्हा परिषदेत सर्वोत्तम सेवा बजावून नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्यांनादेखील हक्काच्या वेतनासाठी ६ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे कर्मचाऱ्यांमधील नाराजी वाढली आहे. या गंभीर विषयांवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.