शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

गणेशोत्सवासाठी कोकणात ७२ विशेष रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड/रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी रोड/रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष ...

रत्नागिरी : गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड/रत्नागिरी आणि पनवेल-सावंतवाडी रोड/रत्नागिरीदरम्यान ७२ विशेष गाड्या चालवणार आहे. यातून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष दररोज (३६ फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रात्री १२.२० वाजता सुटून सावंतवाडी रोडला त्याचदिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. सावंतवाडी रोड येथून विशेष गाडी दररोज ५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दुपारी २.४० वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दरसोमवारी व शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री १०.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्यादिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.

या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबणार आहेत.

पनवेल-सावंतवाडी रोड त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या) पनवेल येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी सावंतवाडीला रात्री ८ वाजता पोहोचेल. त्री-साप्ताहिक विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून ७ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ८.४५ वाजता सुटून पनवेलला दुसऱ्यादिवशी सकाळी ७.१० वाजता पोहोचेल.

या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबणार आहेत.

पनवेल-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (१० फेऱ्या) पनवेल येथून ९ सप्टेंबरपासून २३ सप्टेंबरपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी ३.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी रत्नागिरी येथून ६ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी पहाटे ६ वाजता पनवेलला पोहोचेल. या गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली आणि संगमेश्वर येथे थांबणार आहेत.