शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

रत्नागिरीतील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम मार्गी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरातील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण ...

रत्नागिरी : शहरातील नळपाणी योजनेचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत. शहरातील अकरा हजार जोडण्यांना सव्वादोन कोटींचे मीटर नगर परिषद स्वखर्चाने बसविणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये उपस्थित होते.

पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. मात्र, त्यासाठी वर्कऑर्डर काढण्यात आली असून, पावसाळ्यानंतर तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. आचारसंहितेचाही अडसर त्यासाठी भासणार नसल्याचे सांगितले. १४ कोटी २८ लाख ५४ हजार रुपयांची नगर परिषद इमारतीची निविदा तयार करण्यात आली असून, सोमवारी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली जाणार आहे.

मारुती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी एक कोटी २८ लाख रुपये मंजूर असून, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या माध्यमातून हे सुशोभीकरण केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियमची डागडुजी, तसेच स्टेडियम परिसरातील अन्य दुरुस्तीही केली जाणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठीही निधी मंजूर असून, मुख्य रस्त्याबरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मुरुगवाडा येथील समाजमंदिर दुररुस्तीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. लोकमान्य टिळक स्मारक दुरुस्तीचे काम जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या माध्यमातूनच केले जाणार आहे. तारांगणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, या महाविद्यालयात सुरुवातीला पाच अभ्यासक्रमांचे अध्यापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. १८ ते २९ वयोगटातील तरुणांसाठीच्या लसीकरणाचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद गटामध्ये सुरू असून, त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

................

कारवाई कायदेशीरच

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई कायदेशीरच आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. पालकमंत्री अनिल परब यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.