शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

By admin | Updated: August 15, 2016 00:23 IST

कांचन आजनाळकर : महावितरणचे पथक पुन्हा सक्रिय होणार

रत्नागिरी : जिल्ह््यातील ६९ हजार १८८ ग्राहकांनी १२ कोटी ४३ लाख ६३ हजार रूपयांची वीजबिले न भरल्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. मार्च अखेर केवळ लाखात असलेली थकबाकी आता कोट्यवधीत पोहोचली आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पथक पुन्हा सक्रीय होणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कांचन आजनाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महावितरण कंपनीकडे अनेक ग्राहकांची थकबाकी आहे. यासाठी आता महावितरण कंपनी कडक पावले उचलणार असल्याचे आजनाळकर म्हणाले. चिपळूण विभागात १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार तर रत्नागिरी विभागातील ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात तर सर्वात कमी थकबाकी खेड विभागात आहे. जिल्ह््यातील एकूण ५४ हजार ४२६ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ६० लाख ८९ हजार, वाणिज्य विभागातील ७ हजार ९२६ ग्राहकांकडे २ कोटी ७९ लाख ३ हजार, १३८६ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे. ३ हजार १३८ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे २० लाख ८२ हजार, ५१५ सार्वजनिक पथदीपांची ५६ लाख १ हजार तर अन्य ९६३ ग्राहकांकडे ३० लाख ९४ हजारांची थकबाकी आहे. चिपळूण विभागातील १५ हजार २५४ ग्राहकांकडे १ कोटी ९६ लाख रूपये थकबाकी आहे. २१४५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८१ लाख ४२ हजार तर औद्योगिकच्या ३४५ ग्राहकांकडे ३५ लाख ५७ हजार, कृषीच्या १२४३ ग्राहकांकडे ७ लाख १ हजार, २०९ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २२ लाख ८८ हजार, ५१ सार्वजनिक पथदीपांचे ३ लाख ७ हजार तर १८८ अन्य ग्राहकांकडे ७ लाख १५ हजाराची थकबाकी आहे. एकूण १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १५ हजार ४४ ग्राहकांकडे १ कोटी ७५ लाख ४९ हजार, २०९५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ७२ लाख ३३ हजार, ३६९ औद्योगिक ग्राहकांकडे ४६ लाख १ हजार, कृषीपंपाच्या ६१८ ग्राहकांकडे ५ लाख ९८ हजार, २१९ सार्वजनिक पथदीपांचे १९ लाख १ हजार, ३४७ सार्वजनिक पथदीपांचे ४५ लाख ६४ हजार तर इतर २९९ ग्राहकांकडे ९ लाख ९३ हजारांची थकबाकी आहे. एकूण १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी विभागातील २४ हजार १२८ ग्राहकांकडे २ कोटी ८८ लाख ४७ हजार, ३६८६ वाणिज्यिक ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख २९ हजार, ६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ४१ लाख १९ हजार, कृषीपंपाच्या १ हजार २७७ ग्राहकांकडे ७ लाख ८३ हजार, ४०६ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ३१ लाख २५ हजार, ११७ सार्वजनिक पथदीपांचे ७ लाख ३१ हजार तर इतर ४७६ ग्राहकांकडे १३ लाख ८६ हजार मिळून एकूण ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेकजण हे मुंबई तसेच अन्य शहरात नोकरी व्यवसायासाठी स्थायिक आहेत. गणेशोत्सवासाठी ही मंडळी आवर्जून गावी परततात. या कालावधीत महावितरणने थकबाकी वसुलीसाठी पथक तयार केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे. महावितरणला सहकार्य करणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे आजनाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)