शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

६९ हजार ग्राहकांनी थकविले १२ कोटी

By admin | Updated: August 15, 2016 00:23 IST

कांचन आजनाळकर : महावितरणचे पथक पुन्हा सक्रिय होणार

रत्नागिरी : जिल्ह््यातील ६९ हजार १८८ ग्राहकांनी १२ कोटी ४३ लाख ६३ हजार रूपयांची वीजबिले न भरल्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. मार्च अखेर केवळ लाखात असलेली थकबाकी आता कोट्यवधीत पोहोचली आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पथक पुन्हा सक्रीय होणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कांचन आजनाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महावितरण कंपनीकडे अनेक ग्राहकांची थकबाकी आहे. यासाठी आता महावितरण कंपनी कडक पावले उचलणार असल्याचे आजनाळकर म्हणाले. चिपळूण विभागात १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार तर रत्नागिरी विभागातील ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात तर सर्वात कमी थकबाकी खेड विभागात आहे. जिल्ह््यातील एकूण ५४ हजार ४२६ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ६० लाख ८९ हजार, वाणिज्य विभागातील ७ हजार ९२६ ग्राहकांकडे २ कोटी ७९ लाख ३ हजार, १३८६ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे. ३ हजार १३८ कृषीपंपाच्या ग्राहकांकडे २० लाख ८२ हजार, ५१५ सार्वजनिक पथदीपांची ५६ लाख १ हजार तर अन्य ९६३ ग्राहकांकडे ३० लाख ९४ हजारांची थकबाकी आहे. चिपळूण विभागातील १५ हजार २५४ ग्राहकांकडे १ कोटी ९६ लाख रूपये थकबाकी आहे. २१४५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ८१ लाख ४२ हजार तर औद्योगिकच्या ३४५ ग्राहकांकडे ३५ लाख ५७ हजार, कृषीच्या १२४३ ग्राहकांकडे ७ लाख १ हजार, २०९ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २२ लाख ८८ हजार, ५१ सार्वजनिक पथदीपांचे ३ लाख ७ हजार तर १८८ अन्य ग्राहकांकडे ७ लाख १५ हजाराची थकबाकी आहे. एकूण १९ हजार ४३५ ग्राहकांकडे ३ कोटी ५४ लाख ३ हजारांची थकबाकी आहे. खेड विभागातील १५ हजार ४४ ग्राहकांकडे १ कोटी ७५ लाख ४९ हजार, २०९५ वाणिज्यिक ग्राहकांकडे ७२ लाख ३३ हजार, ३६९ औद्योगिक ग्राहकांकडे ४६ लाख १ हजार, कृषीपंपाच्या ६१८ ग्राहकांकडे ५ लाख ९८ हजार, २१९ सार्वजनिक पथदीपांचे १९ लाख १ हजार, ३४७ सार्वजनिक पथदीपांचे ४५ लाख ६४ हजार तर इतर २९९ ग्राहकांकडे ९ लाख ९३ हजारांची थकबाकी आहे. एकूण १८ हजार ९९१ ग्राहकांकडे ३ कोटी ७४ लाख ४० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी विभागातील २४ हजार १२८ ग्राहकांकडे २ कोटी ८८ लाख ४७ हजार, ३६८६ वाणिज्यिक ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख २९ हजार, ६७२ औद्योगिक ग्राहकांकडे ४१ लाख १९ हजार, कृषीपंपाच्या १ हजार २७७ ग्राहकांकडे ७ लाख ८३ हजार, ४०६ सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ३१ लाख २५ हजार, ११७ सार्वजनिक पथदीपांचे ७ लाख ३१ हजार तर इतर ४७६ ग्राहकांकडे १३ लाख ८६ हजार मिळून एकूण ३० हजार ७६२ ग्राहकांकडे ५ कोटी १५ लाख २० हजार रूपयांची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह््यातील अनेकजण हे मुंबई तसेच अन्य शहरात नोकरी व्यवसायासाठी स्थायिक आहेत. गणेशोत्सवासाठी ही मंडळी आवर्जून गावी परततात. या कालावधीत महावितरणने थकबाकी वसुलीसाठी पथक तयार केले आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित करण्यात येणार आहे. महावितरणला सहकार्य करणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे आजनाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)