शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८७ केंद्रांवर ६५,८४२ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू ...

रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रावर नागरिकांना लसीचा लाभ घेता येणार आहे. या नागरी आरोग्य केंद्रात आतापर्यंत ३११५ जणांनी लाभ घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८७ केंद्रांमध्ये आतापर्यंत एकूण ६५,८४२ लोकांनी लाभ घेतला आहे.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रभावी अस्त्र कोविड लसीकरण हे आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. शहरातील झाडगांव येथील नागरी आरोग्य केंद्रात दोन सत्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागात लसीकरण सत्रे सुरु करण्यात आली आहेत. नागरी आरोग्य केंद्र, झाडगाव, तालुका रत्नागिरी येथे दोन सत्रात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत.या केंद्रात कोवॅक्सिनची लस सकाळी ९ ते दुपारी १२.३०, तर कोविशिल्ड दुपारी १.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दिली जात आहे.

कोरोना लस आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना देण्यात येत असून, कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तिंनादेखील ही लस देण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांनी नागरी आरोग्य केंद्र, झाडगांव येथील दोन्ही सत्रात होणाऱ्या कोविड लसीकरण सत्रांचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात सुरु करण्यात आलेल्या कोविड लसीकरण सत्रांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

चौकट

कोविड लस ही डाव्या हाताच्या दंडावर घेतली जाते. लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर मळमळ होणे, थोडा ताप येणे ही संभाव्य लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येतात. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळतो. मात्र, ही लस घेतली म्हणजे कोविडपासून आपण १०० टक्के सुरक्षित झालो असे नाही. तर कोरोना आजाराची तीव्रता कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील अंतर १ मीटरपेक्षा जास्त ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डाॅ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.