शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

जिल्ह्यातील ८७ केंद्रांवर ६५,८४२ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू ...

रत्नागिरी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना कोरोना लस देण्यात येत आहे. शहरातील झाडगाव येथे दोन सत्रात लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्रावर नागरिकांना लसीचा लाभ घेता येणार आहे. या नागरी आरोग्य केंद्रात आतापर्यंत ३११५ जणांनी लाभ घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८७ केंद्रांमध्ये आतापर्यंत एकूण ६५,८४२ लोकांनी लाभ घेतला आहे.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९चे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रभावी अस्त्र कोविड लसीकरण हे आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. शहरातील झाडगांव येथील नागरी आरोग्य केंद्रात दोन सत्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागात लसीकरण सत्रे सुरु करण्यात आली आहेत. नागरी आरोग्य केंद्र, झाडगाव, तालुका रत्नागिरी येथे दोन सत्रात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत.या केंद्रात कोवॅक्सिनची लस सकाळी ९ ते दुपारी १२.३०, तर कोविशिल्ड दुपारी १.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दिली जात आहे.

कोरोना लस आता ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तिंना देण्यात येत असून, कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तिंनादेखील ही लस देण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांनी नागरी आरोग्य केंद्र, झाडगांव येथील दोन्ही सत्रात होणाऱ्या कोविड लसीकरण सत्रांचा लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात सुरु करण्यात आलेल्या कोविड लसीकरण सत्रांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

चौकट

कोविड लस ही डाव्या हाताच्या दंडावर घेतली जाते. लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर मळमळ होणे, थोडा ताप येणे ही संभाव्य लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येतात. लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळतो. मात्र, ही लस घेतली म्हणजे कोविडपासून आपण १०० टक्के सुरक्षित झालो असे नाही. तर कोरोना आजाराची तीव्रता कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमधील अंतर १ मीटरपेक्षा जास्त ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डाॅ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.