शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पाच जागांसाठी ६५ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST

एकाच दिवशी विक्रमी ५९ अर्ज : चारही प्रमुख पक्षांना उमेदवार सापडले

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज, शनिवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकूण ४१ उमेदवारांचे विक्रमी ५९ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. त्यात दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज सादर केले. दापोलीतून अजित तांबे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), आदम अब्दुल चोगले (बहुजन मुक्ती मोर्चा), सूर्यकांत दळवी (शिवसेना), वैभव खेडेकर (मनसे), संजय कदम (राष्ट्रवादी), अ‍ॅड. सुजित झिमण (काँग्रेस), किशोर देसाई (अपक्ष आणि काँग्रेस), ज्ञानदेव खांबे (बसपा), सुनील खेडेकर (अपक्ष), प्रविण कोलगे (शेतकरी कामगार पक्ष), प्रदीप गंगावणे या बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुहागरात सुरेश गमरे (बसपा), विजय असगोलकर (काँग्रेस), विजयकुमार भोसले (शिवसेना), भास्कर जाधव (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चिपळुणात अनंत विश्राम जाधव (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया - आठवले गट), लियाकत शाह (अपक्ष), अशोक जाधव (काँग्रेस), रश्मी कदम (काँग्रेस), माधव गवळी (भाजप), यशवंत तांबे (रिब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कांबळे गट), गोपीनाथ झेपले (अपक्ष), उमेश पवार (बहुजन मुक्ती पार्टी), संतोष गुरव (अपक्ष) या नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रत्नागिरीतून उदय सामंत (शिवसेना), दिनेश पवार (बसप), संदीप गावडे (अपक्ष), नंदकुमार मोहिते (बहुजन विकास आघाडी), रमेश कीर (काँग्रेस), बशीर मुतुर्जा (राष्ट्रवादी), उदय सावंत (अपक्ष), मनीष तळेकर (अपक्ष), प्रवीण जाधव (अपक्ष) आदी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.राजापुरातून राजेंद्र देसाई, अजित यशवंतराव (राष्ट्रवादी), संजय यादवराव (भाजप), रुपेश विजय गांगण(भाजप), संदीप सखाराम कांबळे (आरपीआय), गणपत रामचंद्र जाधव (अपक्ष) या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ उमेदवारांचे १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत.या सर्व अर्जाची छाननी आता सोमवारी (दि. २९) होणार आहे. (प्रतिनिधी) दापोली राष्ट्रवादीत बंडखोरी?दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, येथील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार असताना त्यांनी काँग्रेसतर्फेही अर्ज केला आहे. ते आपला अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.विक्रमी अर्जएकाच दिवशी ५९ अर्ज दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यादी जाहीर होण्यात झालेला विलंब आणि युती-आघाडीत झालेले वाद यामुळे शेवटच्या क्षणी सर्वपक्षीयांचे अर्ज दाखल झाले.