शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाच जागांसाठी ६५ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST

एकाच दिवशी विक्रमी ५९ अर्ज : चारही प्रमुख पक्षांना उमेदवार सापडले

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी आज, शनिवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात एकूण ४१ उमेदवारांचे विक्रमी ५९ अर्ज दाखल झाले. जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले. त्यात दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी आज आपले अर्ज सादर केले. दापोलीतून अजित तांबे (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया), आदम अब्दुल चोगले (बहुजन मुक्ती मोर्चा), सूर्यकांत दळवी (शिवसेना), वैभव खेडेकर (मनसे), संजय कदम (राष्ट्रवादी), अ‍ॅड. सुजित झिमण (काँग्रेस), किशोर देसाई (अपक्ष आणि काँग्रेस), ज्ञानदेव खांबे (बसपा), सुनील खेडेकर (अपक्ष), प्रविण कोलगे (शेतकरी कामगार पक्ष), प्रदीप गंगावणे या बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुहागरात सुरेश गमरे (बसपा), विजय असगोलकर (काँग्रेस), विजयकुमार भोसले (शिवसेना), भास्कर जाधव (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. चिपळुणात अनंत विश्राम जाधव (रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया - आठवले गट), लियाकत शाह (अपक्ष), अशोक जाधव (काँग्रेस), रश्मी कदम (काँग्रेस), माधव गवळी (भाजप), यशवंत तांबे (रिब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कांबळे गट), गोपीनाथ झेपले (अपक्ष), उमेश पवार (बहुजन मुक्ती पार्टी), संतोष गुरव (अपक्ष) या नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. रत्नागिरीतून उदय सामंत (शिवसेना), दिनेश पवार (बसप), संदीप गावडे (अपक्ष), नंदकुमार मोहिते (बहुजन विकास आघाडी), रमेश कीर (काँग्रेस), बशीर मुतुर्जा (राष्ट्रवादी), उदय सावंत (अपक्ष), मनीष तळेकर (अपक्ष), प्रवीण जाधव (अपक्ष) आदी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.राजापुरातून राजेंद्र देसाई, अजित यशवंतराव (राष्ट्रवादी), संजय यादवराव (भाजप), रुपेश विजय गांगण(भाजप), संदीप सखाराम कांबळे (आरपीआय), गणपत रामचंद्र जाधव (अपक्ष) या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातून ६५ उमेदवारांचे १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत.या सर्व अर्जाची छाननी आता सोमवारी (दि. २९) होणार आहे. (प्रतिनिधी) दापोली राष्ट्रवादीत बंडखोरी?दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय कदम यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र, येथील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार असताना त्यांनी काँग्रेसतर्फेही अर्ज केला आहे. ते आपला अर्ज कायम ठेवणार की मागे घेणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.विक्रमी अर्जएकाच दिवशी ५९ अर्ज दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. यादी जाहीर होण्यात झालेला विलंब आणि युती-आघाडीत झालेले वाद यामुळे शेवटच्या क्षणी सर्वपक्षीयांचे अर्ज दाखल झाले.