शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

६० सुरक्षारक्षक अखेर पुन्हा सेवेत

By admin | Updated: February 23, 2016 00:33 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा : राजन साळवींच्या शिष्टाईला यश

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंंधुदुर्गमध्ये कोकण सुरक्षा मंडळांतर्गत महापारेषण खात्यात सेवा देणाऱ्या ६० सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सेवेतून कमी करण्यात आल्यानंतर आमदार राजन साळवी यांना कामगार मंत्री प्रकाश मेहता व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचेकडे कामगारांची सातत्यपूर्ण बाजू मांडल्यानंतर या सर्व ६० सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. १५ ते २० वर्षांपासून सेवा देणाऱ्या या सुरक्षारक्षकांना शैक्षणिक वा शारीरिक स्वरुपाची अट लागू पडत नव्हती. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार या सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होताना किमान ८वी परीक्षा उत्तीर्णची अनाकलनीय अट घालणेत आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे सुरक्षारक्षक हे बहुतांशी स्थानिक, ग्रामीण भागातील व कमी शिक्षण झालेले असून, त्यांचे संपूर्ण कुटूंब या सेवेतून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे. अशा रत्नागिरी-सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० सुरक्षारक्षकांना या शासन निर्णयाचा फटका बसल्याने त्यांना दि. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी या सुरक्षारक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शासन निर्णयामुळे प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील या सुरक्षारक्षकांनी आपली ही समस्या साळवी यांच्या दफ्तरी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार साळवींनी नागपूर येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्याचे कामगार, गृहनिर्माण व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते व शासन निर्णयामुळे कोकणासहित राज्यातील अनेक सुरक्षारक्षक देशोधडीला लागणार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मेहता यांनी तातडीने स्वीय सचिव अनिल लाकसवार यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी संपर्क साधला व आपण अनेक वर्षे सेवा बजावित असलेल्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच सुधारीत आदेश पारीत करणार असल्याचे स्पष्ट केले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या माध्यमातून सेवेतून मुक्त केलेल्या ६० सुरक्षारक्षकांना आता कोकण सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाढीव मुदत देऊन सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आले आहे. या सुरक्षारक्षकांना कोकण सुरक्षा मंडळाच्या मार्फत कायमची सेवा देणेच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रक्रिया चालू असून, नजीकच्या काळात या सर्व रक्षकांना सेवेत कायम ठेवले जाईल. (प्रतिनिधी) प्रश्न मार्गी : कर्मचाऱ्यांचा नि:श्वास रत्नागिरी जिल्ह््यातील खेड -लोटे, संगमेश्वर - आरवली, चिपळूण -दस्तुरी, रत्नागिरी - पावस, निवळी, कुवारबांव, राजापूर - ओणी तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली, कणकवली, कुडाळ, तळेबाजार व खारेपाटण येथील कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक कार्यरत होते.