शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

६० सुरक्षारक्षक अखेर पुन्हा सेवेत

By admin | Updated: February 23, 2016 00:33 IST

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा : राजन साळवींच्या शिष्टाईला यश

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंंधुदुर्गमध्ये कोकण सुरक्षा मंडळांतर्गत महापारेषण खात्यात सेवा देणाऱ्या ६० सुरक्षा रक्षकांना शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सेवेतून कमी करण्यात आल्यानंतर आमदार राजन साळवी यांना कामगार मंत्री प्रकाश मेहता व सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांचेकडे कामगारांची सातत्यपूर्ण बाजू मांडल्यानंतर या सर्व ६० सुरक्षा रक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. १५ ते २० वर्षांपासून सेवा देणाऱ्या या सुरक्षारक्षकांना शैक्षणिक वा शारीरिक स्वरुपाची अट लागू पडत नव्हती. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार या सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होताना किमान ८वी परीक्षा उत्तीर्णची अनाकलनीय अट घालणेत आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे सुरक्षारक्षक हे बहुतांशी स्थानिक, ग्रामीण भागातील व कमी शिक्षण झालेले असून, त्यांचे संपूर्ण कुटूंब या सेवेतून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे. अशा रत्नागिरी-सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० सुरक्षारक्षकांना या शासन निर्णयाचा फटका बसल्याने त्यांना दि. २५ नोव्हेंबर २०१५ रोजी या सुरक्षारक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. शासन निर्णयामुळे प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील या सुरक्षारक्षकांनी आपली ही समस्या साळवी यांच्या दफ्तरी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार साळवींनी नागपूर येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्याचे कामगार, गृहनिर्माण व खनिकर्म मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते व शासन निर्णयामुळे कोकणासहित राज्यातील अनेक सुरक्षारक्षक देशोधडीला लागणार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मेहता यांनी तातडीने स्वीय सचिव अनिल लाकसवार यांच्या माध्यमातून रत्नागिरीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी संपर्क साधला व आपण अनेक वर्षे सेवा बजावित असलेल्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच सुधारीत आदेश पारीत करणार असल्याचे स्पष्ट केले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या माध्यमातून सेवेतून मुक्त केलेल्या ६० सुरक्षारक्षकांना आता कोकण सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून वाढीव मुदत देऊन सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आले आहे. या सुरक्षारक्षकांना कोकण सुरक्षा मंडळाच्या मार्फत कायमची सेवा देणेच्या अनुषंगाने शासनस्तरावर प्रक्रिया चालू असून, नजीकच्या काळात या सर्व रक्षकांना सेवेत कायम ठेवले जाईल. (प्रतिनिधी) प्रश्न मार्गी : कर्मचाऱ्यांचा नि:श्वास रत्नागिरी जिल्ह््यातील खेड -लोटे, संगमेश्वर - आरवली, चिपळूण -दस्तुरी, रत्नागिरी - पावस, निवळी, कुवारबांव, राजापूर - ओणी तसेच सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली, कणकवली, कुडाळ, तळेबाजार व खारेपाटण येथील कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक कार्यरत होते.