शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यात ५९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

रत्नागिरी : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ५९६ ...

रत्नागिरी : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ५९६ रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवसात ७ आणि मागील दहा अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बरे झालेल्या ५२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून तब्बल ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २४,२२२ इतकी झाली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २७७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून ॲंटिजेन चाचणीत ३१९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या तब्बल २४६ चिपळूण तालुक्यात आहे. त्याखालोखाल रत्नागिरीत ८४, दापोली ४५, खेड ६८, गुहागर ४८, संगमेश्वर ३८, मंडणगड १६, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात २५ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत १७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ७१५ इतकी झाली आहे. मंगळवारी नोंदविलेल्या या १७ मृत्यूंमध्ये दापोली आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी ५, संगमेश्वरमध्ये ७ आणि राजापूर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. मृत्यूची टक्केवारी २.९५ इतकी आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बरे झालेल्या ५२१ जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ९१२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होणाऱ्यांची टक्केवारी आता ६९.८२ इतकी झाली आहे. तसेच एका दिवसात केलेल्या चाचणीत ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत. सध्या विविध ठिकाणी ६५९५ रुग्ण उपचार घेत आहेत.