शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

जिल्ह्यात ५९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

रत्नागिरी : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ५९६ ...

रत्नागिरी : गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिकाधिक भर पडू लागली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या ५९६ रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवसात ७ आणि मागील दहा अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बरे झालेल्या ५२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून तब्बल ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २४,२२२ इतकी झाली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २७७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून ॲंटिजेन चाचणीत ३१९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या तब्बल २४६ चिपळूण तालुक्यात आहे. त्याखालोखाल रत्नागिरीत ८४, दापोली ४५, खेड ६८, गुहागर ४८, संगमेश्वर ३८, मंडणगड १६, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात २५ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत १७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ७१५ इतकी झाली आहे. मंगळवारी नोंदविलेल्या या १७ मृत्यूंमध्ये दापोली आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी ५, संगमेश्वरमध्ये ७ आणि राजापूर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे. मृत्यूची टक्केवारी २.९५ इतकी आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बरे झालेल्या ५२१ जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ९१२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होणाऱ्यांची टक्केवारी आता ६९.८२ इतकी झाली आहे. तसेच एका दिवसात केलेल्या चाचणीत ५९२ जणांचे अहवाल अबाधित आले आहेत. सध्या विविध ठिकाणी ६५९५ रुग्ण उपचार घेत आहेत.