शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५५४ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

चिपळूण : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या भरपाई व ...

चिपळूण : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या भरपाई व मदतीसाठी राज्य सरकारने ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी गुरुवारी मंजूर केला. येत्या दोन दिवसात हा निधी त्या-त्या जिल्ह्यांत वर्ग केला जाणार आहे.

गेल्या महिनाभरात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक या भागांना मोठा फटका बसला. पूरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन यामुळे विस्कळीत झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनुदान स्वरूपात मदत देण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. केंद्राकडून आवश्यक मदत पुरविण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आहे. याशिवाय राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने शक्य होईल तितकी मदत नुकसानग्रस्तांना करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली हाेती. या बैठकीतील निर्णयानुसार बाधित नागरिकांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जुलै २०२१मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मृत जनावरांसाठी, शिवाय पूर्णत: नष्ट किंवा अंशत: पडझड झालेली कच्ची व पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी मदत दिली जाणार आहे. याशिवाय दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानासाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून मदत केली जाणार आहे. त्यासाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे महाड (जि. रायगड)सह रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर ही शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. येथील व्यापारी व शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी वेळोवेळी निवेदन व बैठका घेतल्या जात आहेत तसेच वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आता या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.