शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५५४ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

चिपळूण : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या भरपाई व ...

चिपळूण : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या भरपाई व मदतीसाठी राज्य सरकारने ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी गुरुवारी मंजूर केला. येत्या दोन दिवसात हा निधी त्या-त्या जिल्ह्यांत वर्ग केला जाणार आहे.

गेल्या महिनाभरात राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक या भागांना मोठा फटका बसला. पूरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांचे जनजीवन यामुळे विस्कळीत झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनुदान स्वरूपात मदत देण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. केंद्राकडून आवश्यक मदत पुरविण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आहे. याशिवाय राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने शक्य होईल तितकी मदत नुकसानग्रस्तांना करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर ३ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली हाेती. या बैठकीतील निर्णयानुसार बाधित नागरिकांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जुलै २०२१मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मृत जनावरांसाठी, शिवाय पूर्णत: नष्ट किंवा अंशत: पडझड झालेली कच्ची व पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी मदत दिली जाणार आहे. याशिवाय दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानासाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून मदत केली जाणार आहे. त्यासाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे महाड (जि. रायगड)सह रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर ही शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. येथील व्यापारी व शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी वेळोवेळी निवेदन व बैठका घेतल्या जात आहेत तसेच वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आता या शासन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.