शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

By admin | Updated: July 15, 2017 14:44 IST

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १५ : कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर लागवड अवलंबून आहे. मात्र, यावर्षी एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब होत आहे. जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत सरासरी ११७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. ८ आणि ९ जुलै रोजी चांगला पाऊस झाला. मात्र, पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर लागवडीची कामे उरकावी लागत आहेत.जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. पैकी आतापर्यंत ५०४६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जात असली तरी आतापर्यंत ३१९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तृणधान्यापैकी वरीची लागवड २८५ हेक्टरवर करण्यात आली आहे. ८१० हेक्टर क्षेत्रावर कडधान्य लागवड केली आहे. जिल्ह्यात ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येते. पैकी ७१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण ९९ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येत असली तरी आतापर्यंत ५४ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असल्याने ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून कमी राहिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३५० ते ४०० मिलिमीटर पावसाचा फरक राहिल्याने कोरडा पावसाळा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर लागवडीची कामे सुरू आहेत. दिवसातून एखादी सर कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी पंपाचा वापर करावा लागत आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत असून, पावसामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.