शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरी जिल्ह्यात ५५ टक्के लागवड पूर्ण

By admin | Updated: July 15, 2017 14:44 IST

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. १५ : कोकणातील भातशेती पावसाच्या पाण्यावर लागवड अवलंबून आहे. मात्र, यावर्षी एकूणच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने लागवडीच्या कामाला विलंब होत आहे. जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत सरासरी ११७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. ८ आणि ९ जुलै रोजी चांगला पाऊस झाला. मात्र, पुन्हा वातावरणात बदल झाला आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर लागवडीची कामे उरकावी लागत आहेत.जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. पैकी आतापर्यंत ५०४६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जात असली तरी आतापर्यंत ३१९५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तृणधान्यापैकी वरीची लागवड २८५ हेक्टरवर करण्यात आली आहे. ८१० हेक्टर क्षेत्रावर कडधान्य लागवड केली आहे. जिल्ह्यात ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात येते. पैकी ७१४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण ९९ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येत असली तरी आतापर्यंत ५४ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असल्याने ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून कमी राहिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३५० ते ४०० मिलिमीटर पावसाचा फरक राहिल्याने कोरडा पावसाळा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाचे मोठे प्रकल्प नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर लागवडीची कामे सुरू आहेत. दिवसातून एखादी सर कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी पंपाचा वापर करावा लागत आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत असून, पावसामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.