शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

फलोत्पादन अभियानांतर्गत ५४६ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: September 8, 2015 22:32 IST

कृषी अधीक्षक कार्यालय : अद्याप १९९ प्रस्ताव प्रलंबित

रत्नागिरी : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे विविध यांत्रिक अवजारांबरोबर शेततळे, हरितगृहे, पॅक हाऊस, तसेच प्रक्रिया उद्योग यांसारख्या विविध ५४६ प्रस्तावांना आॅगस्टअखेर मंजुरी देण्यात आली आहे, तर १९९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.शेतीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे शिवाय मजुरी वाढली असल्याने यंत्राचा वापर वाढला आहे. शिवाय बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे खर्च वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी विविध पिकांसाठी संशोधन करत आहेत.शासनाकडून यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५४६ विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे ७, फुले लागवडीचे २, पुनरूज्जीवन २, सामूहिक शेततळे ८, नियंत्रित शेती हरितगृह ३, मल्चींग ३, शेडनेट १, पिक संरक्षक उपकरणांमध्ये ग्रासकटर, स्पे्रअर पंपाचे १६२, फलोत्पादन यांत्रिकी ८ बीएचपी कमीचे ३८, तर जास्तचे ३७, २० बीएचपीच्या २४४ ट्रॅक्टर १ प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत पॅक हाऊसचे १९, प्रक्रिया उद्योग ५, वातानुकूलीत वाहन १ व अन्य ७ मिळून एकूण ५४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यात १५, दापोली ४७, खेड ४२, चिपळूण १४, गुहागर २१, संगमेश्वर २२, रत्नागिरी १५५, लांजा ८८, राजापूर तालुक्यातील १४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.आॅगस्टअखेर १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे २, फुले लागवड १, पुनरूज्जीवन १६, सामूहिक शेततळे २, शेडनेट २, पीक संरक्षण उपकरणे ३८, फलोत्पादन यांत्रिकीकरण ८ बीएचपी कमीचे २, जास्तचे १० व २० बीएचपीचे ९०, ट्रॅक्टर ३ प्रस्ताव प्रलंबित आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत एकात्मिक शीतसाखळीचे १ व अन्य ३२ मिळून १९९ प्रस्ताव प्रलंबित असून, लवकरच त्यांना मंजूरी देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.मंडणगड तालुक्यात ८, दापोली २२, खेड १०, चिपळूण ५, गुहागर ८, संगमेश्वर २०, रत्नागिरी १०१, लांजा २३, राजापूर तालुक्यातील २ मिळून १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)