शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

जिल्ह्यात ५,४२३ लोकांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ गावांतील ३८ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण आहेत. त्यातच कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने या टंचाईग्रस्तांसाठी पाण्यासाठी हाल होत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यांना जनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले, विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून पाण्याची पातळी खालावलेली आहे. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.

टंचाईग्रस्त गावांना शासकीय ३ आणि खासगी ७ अशा केवळ १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गुंतले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम टंचाईग्रस्तांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

................................

टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर...

तालुका गावे वाड्या टँकर

मंडणगड ०१ ०१ ०१

रत्नागिरी ०२ ०६ ०१

खेड ०८ ०९ ०३

चिपळूण ०५ ०७ ०१

संगमेश्वर ०५ ०७ ०२

लांजा ०५ ०५ ०१

राजापूर ०१ ०१ ०१

एकूण-- २७ ३८ १०

.................................

वाड्या आणि लोकसंख्या

तालुका वाड्या लोकसंख्या

मंडणगड ०१ ६१०

रत्नागिरी ०६ १४१६

खेड ११ १३२०

चिपळूण ०७ ८२७

संगमेश्वर ०७ ९५९

लांजा ०५ ७१३

राजापूर ०१ २८

एकूण- ३८ ५४२३

.............................

पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासत असली तरी टंचाई कृती आराखड्यातील कामे सुरू झालेली नाहीत. अजूनही पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यावर कोरोनाचे सावट असतानाच पाणीटंचाईची भीषणताही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.