शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५,४२३ लोकांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ गावांतील ३८ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण आहेत. त्यातच कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने या टंचाईग्रस्तांसाठी पाण्यासाठी हाल होत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यांना जनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले, विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून पाण्याची पातळी खालावलेली आहे. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.

टंचाईग्रस्त गावांना शासकीय ३ आणि खासगी ७ अशा केवळ १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गुंतले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम टंचाईग्रस्तांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

................................

टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर...

तालुका गावे वाड्या टँकर

मंडणगड ०१ ०१ ०१

रत्नागिरी ०२ ०६ ०१

खेड ०८ ०९ ०३

चिपळूण ०५ ०७ ०१

संगमेश्वर ०५ ०७ ०२

लांजा ०५ ०५ ०१

राजापूर ०१ ०१ ०१

एकूण-- २७ ३८ १०

.................................

वाड्या आणि लोकसंख्या

तालुका वाड्या लोकसंख्या

मंडणगड ०१ ६१०

रत्नागिरी ०६ १४१६

खेड ११ १३२०

चिपळूण ०७ ८२७

संगमेश्वर ०७ ९५९

लांजा ०५ ७१३

राजापूर ०१ २८

एकूण- ३८ ५४२३

.............................

पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासत असली तरी टंचाई कृती आराखड्यातील कामे सुरू झालेली नाहीत. अजूनही पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यावर कोरोनाचे सावट असतानाच पाणीटंचाईची भीषणताही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.