शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

जिल्ह्यात ५,४२३ लोकांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात ५,४२३ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून त्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या २७ गावांतील ३८ वाड्यांमधील टँकर्सग्रस्तांना १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण आहेत. त्यातच कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने या टंचाईग्रस्तांसाठी पाण्यासाठी हाल होत आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई उद्भवते. या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे. डोंगर-दऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यांना जनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत. कडक उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले, विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

दिवसेेंदिवस टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून पाण्याची पातळी खालावलेली आहे. या टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करताना शासनाची दमछाक होत आहे. लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे.

टंचाईग्रस्त गावांना शासकीय ३ आणि खासगी ७ अशा केवळ १० टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन गुंतले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम टंचाईग्रस्तांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

................................

टंचाईग्रस्त गावे, वाड्या व टँकर...

तालुका गावे वाड्या टँकर

मंडणगड ०१ ०१ ०१

रत्नागिरी ०२ ०६ ०१

खेड ०८ ०९ ०३

चिपळूण ०५ ०७ ०१

संगमेश्वर ०५ ०७ ०२

लांजा ०५ ०५ ०१

राजापूर ०१ ०१ ०१

एकूण-- २७ ३८ १०

.................................

वाड्या आणि लोकसंख्या

तालुका वाड्या लोकसंख्या

मंडणगड ०१ ६१०

रत्नागिरी ०६ १४१६

खेड ११ १३२०

चिपळूण ०७ ८२७

संगमेश्वर ०७ ९५९

लांजा ०५ ७१३

राजापूर ०१ २८

एकूण- ३८ ५४२३

.............................

पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासत असली तरी टंचाई कृती आराखड्यातील कामे सुरू झालेली नाहीत. अजूनही पाणी पुरवठ्याची कामे निविदास्तरावर आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्ह्यावर कोरोनाचे सावट असतानाच पाणीटंचाईची भीषणताही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.