शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दिल्लीला ५,४०० डझन आंबा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : या वर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी अन्य राज्यांसह परदेशातून आंब्याला विशेष मागणी होत ...

रत्नागिरी : या वर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी अन्य राज्यांसह परदेशातून आंब्याला विशेष मागणी होत आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून दिल्लीमध्ये पाच हजार चारशे डझन आंबा पाठविण्यात आला असून, एक हजार ६६४ डझन आंबा लंडन, कतार, कॅनडासाठी थेट रत्नागिरीतून निर्यात करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडील पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. गुढीपाडव्याला स्थानिक तसेच मुंबई मार्केटमध्ये बागायतदारांनी आंबा विक्रीसाठी पाठविला. परदेशातून मागणी होत असतानाही अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण १८०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे. दिल्लीतून पुन्हा आंब्यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. कॅनडासाठी ४०८ व लंडनसाठी ४२० डझन आंब्याची नव्याने मागणी नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना जागेवरच आंब्याला ८५० रुपये डझन दर लाभत आहे. वाशी मार्केटमधून आखाती व युरोपीय देशांत निर्यात सुरू असली तरी रत्नागिरीतून थेट निर्यात सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. निर्यातीपूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्राइंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग केला जातो. त्यानंतर वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत आहे.

...................................

अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर प्राप्त व्हावा, तसेच कोकणचा हापूस जगातील विविध देशांपर्यंत पोहोचून बाजारपेठ खुली व्हावी, यासाठी थेट निर्यातीवर भर देण्यात आला आहे. केवळ परदेशातच नाही तर देशातील विविध राज्यांतील बाजारपेठेत आंबा पोहोचावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस