शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जिल्ह्यात सात वर्षांत लेप्टोचे ५१४ रुग्ण

By admin | Updated: August 21, 2016 22:24 IST

१४ जणांचा मृत्यू

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी सात वर्षांमध्ये लेप्टोस्पायरोसीस या जीवघेण्या रोगाचे ५१४ रुग्ण आढळून आले असून, त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आर्थिक वर्षातील चालू पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत लेप्टाचे २८ रुग्ण सापडले. लेप्टोस्पायरोसीस हा रोग बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक वर्षापर्यंत लघवीतून बाहेर पडतात. काही प्राण्यांत आयुष्यभर हे जंतू शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती भाज्या यांच्या व माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. मागील सात वर्षांच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सन २०१०-११ मध्ये २५ जणांना या रोगाची लागण होेऊन २ लोक दगावले होते. तसेच २०११-१२ या दुसऱ्याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोची भयंकरपणे १३८ जणांना लागण झाली होती. त्यामध्ये ९ रुग्णांचा मृत्यु झाला होता. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८२ जणांना लेप्टो झाला असला तरी एकही रुग्ण मृत्यू पावलेला नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात लेप्टोचे १०१ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये उपचार सुरु असताना लेप्टोच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत लेप्टो झालेले १४ रुग्ण जिल्ह्यात दगावले आहेत. सन १०१४-१५मध्ये ८४ रुग्ण, तर सन २०१५-१६ मध्ये ५६ रुग्ण सापडले असून, या दोन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील सात वर्षांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविली. त्याचा परिणाम म्हणून आज शेतीची कामे सुरु असताना जिल्ह्यात मागील पाच वर्षांपेक्षा लेप्टोच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात लेप्टोचे केवळ २८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालये या ठिकाणी या आजारावरील पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात आलेला आहे. (शहर वार्ताहर) लेप्टोची लक्षणे : तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मुत्रपिंडाचे, यकृताचे काम बंद पडून मृत्युही ओढवू शकतो. जिल्ह्यात सात वर्षातील लेप्टोस्पायरोसीसची स्थिती सन सापडलेले रुग्ण २०१०-११ २५ २०११-१२ १३८ २०१२-१३ ८२ २०१३-१४ १०१ २०१४-१५ ८४ २०१५-१६ ५६ २०१६-१७ २८ प्रतिबंधात्मक उपाययोजना : ४दूषित पाणी, माती किंवा भाज्या यांचा मानवी संपर्क टाळणे हा उपाय आहे. ४दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट, हातमोजे वापरावेत. ४या आजाराचा रूग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला कळवावी. ४शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरित ड्रेसिंग करुन घ्यावे.