शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात सात वर्षांत लेप्टोचे ५१४ रुग्ण

By admin | Updated: August 21, 2016 22:24 IST

१४ जणांचा मृत्यू

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी सात वर्षांमध्ये लेप्टोस्पायरोसीस या जीवघेण्या रोगाचे ५१४ रुग्ण आढळून आले असून, त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आर्थिक वर्षातील चालू पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत लेप्टाचे २८ रुग्ण सापडले. लेप्टोस्पायरोसीस हा रोग बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. हे जंतू एक वर्षापर्यंत लघवीतून बाहेर पडतात. काही प्राण्यांत आयुष्यभर हे जंतू शरीरात राहतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती भाज्या यांच्या व माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. मागील सात वर्षांच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सन २०१०-११ मध्ये २५ जणांना या रोगाची लागण होेऊन २ लोक दगावले होते. तसेच २०११-१२ या दुसऱ्याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये लेप्टोची भयंकरपणे १३८ जणांना लागण झाली होती. त्यामध्ये ९ रुग्णांचा मृत्यु झाला होता. सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८२ जणांना लेप्टो झाला असला तरी एकही रुग्ण मृत्यू पावलेला नाही. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात लेप्टोचे १०१ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये उपचार सुरु असताना लेप्टोच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत लेप्टो झालेले १४ रुग्ण जिल्ह्यात दगावले आहेत. सन १०१४-१५मध्ये ८४ रुग्ण, तर सन २०१५-१६ मध्ये ५६ रुग्ण सापडले असून, या दोन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील सात वर्षांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविली. त्याचा परिणाम म्हणून आज शेतीची कामे सुरु असताना जिल्ह्यात मागील पाच वर्षांपेक्षा लेप्टोच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात लेप्टोचे केवळ २८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालये या ठिकाणी या आजारावरील पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात आलेला आहे. (शहर वार्ताहर) लेप्टोची लक्षणे : तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मुत्रपिंडाचे, यकृताचे काम बंद पडून मृत्युही ओढवू शकतो. जिल्ह्यात सात वर्षातील लेप्टोस्पायरोसीसची स्थिती सन सापडलेले रुग्ण २०१०-११ २५ २०११-१२ १३८ २०१२-१३ ८२ २०१३-१४ १०१ २०१४-१५ ८४ २०१५-१६ ५६ २०१६-१७ २८ प्रतिबंधात्मक उपाययोजना : ४दूषित पाणी, माती किंवा भाज्या यांचा मानवी संपर्क टाळणे हा उपाय आहे. ४दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरबूट, हातमोजे वापरावेत. ४या आजाराचा रूग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला कळवावी. ४शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरित ड्रेसिंग करुन घ्यावे.