शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

५१ गावांतील जमिनींचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: October 24, 2015 00:39 IST

इको-सेन्सिटिव्हचा फटका : शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील परिस्थिती

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम घाटातील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ५१ गावांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. याचा परिणाम म्हणून तालुक्यातील आंबा, मलकापूर, गजापूर, करंजफेण, शित्तूर वारुण, आदी गावांतील जमिनींचे संपूर्ण व्यवहार थंड पडले आहेत. जमिनींची खरेदी-विक्री थांबल्याने जमिनी खरेदी करू इच्छिणाऱ्यांची मोठी पंचाईत आली आहे.शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीचा पट्टा व पश्चिम घाटातील ५१ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश झाला आहे. त्यातील काही गावांचा बफर झोन, व्याघ्र प्रकल्पांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील ५६,८२५ चौरस कि.मी. इतके क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १८४ गावांपैकी शाहूवाडी तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्रात १७.३४० चौरस कि़मी. क्षेत्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे.तालुक्यातील आंबा शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना येथील विकासकामावर इको-सेन्सिटिव्ह झोनचा परिणाम झाला आहे. मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, आदी शहरांतील व्यावसायिकांनी आंबा, मलकापूर, गेळवडे, आदी परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. आंबा येथे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, विश्रामगृह, एन. ए. प्लॉट, खरेदी-विक्री सुरू होती. बारा ते पंधरा लाख रुपये एक एकरचा दर सुरू होता. तर एन. ए. प्लॉटचा दर तीन ते चार लाख रुपये सुरू होता. दरम्यान, हा परिसर इको-सेन्सिटिव्ह, बफर झोन, व्याघ्र प्रकल्प, आदी घोषित झाला आहे. त्यामुळे येथील जमीन खरेदी करण्यास व्यावसायिक येत नसल्यामुळे संपूर्ण खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले आहेत. याचा परिणाम येथील हॉटेलवरदेखील झाला आहे. आंबा, चाळणवाडी, तळवडे, चांदोली परिसरातील जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. मात्र, सध्या आर्थिक मंदीचा फटका या व्यवहाराला बसला आहे. येथील स्थानिकांना छोटी-मोठी कामेदेखील मिळेनाशी झाली आहेत. (प्रतिनिधी)