शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

चिपळुणातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या खात्यात ५० हजार जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या खात्यात तातडीची ५० हजारांची रक्कम जमा होऊ लागली आहे. याशिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यातही ...

चिपळूण : महापुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या खात्यात तातडीची ५० हजारांची रक्कम जमा होऊ लागली आहे. याशिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यातही रक्कम जमा होत असल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत १०,१७० लाभार्थ्यांना १२ कोटी ५३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील व्यापाऱ्यांना २ कोटी २९ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले असून, अजूनही वाटपाचे काम सुरूच आहे.

चिपळूण शहरासह परिसरात २२ व २३ जुलै रोजी महापूर आला होता. यावेळी व्यापाऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली मदत थेट नागरिकांच्या खात्यात जमा होत असताना व्यापारी मात्र मदतीपासून वंचित होते. याची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना तातडीने मदत निधा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत व्यापाऱ्यांना तातडीची मदत देण्यास सुरूवात झाली आहेण

व्यापाऱ्यांच्या खात्यात ५० हजारांची रक्कम जमा होत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत व्यापाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटच्या व्यापाऱ्याला मदत मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.