शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

जिल्ह्यात एसटीच्या ५० बसेस विजेवर धावणार, खर्चात बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अद्ययावत सेवा देत असतानाच इंधन खर्च कमी करण्यासाठी ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अद्ययावत सेवा देत असतानाच इंधन खर्च कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विभागांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. रत्नागिरी विभागाकडून सुरुवातीला विजेवरील ५० गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारमान घटल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे. उत्पन्नातील घट भरून काढण्यासाठी इंधन खर्च कमी करण्याची आवश्यता आहे. त्यावर पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या सेवेत आणण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागात सुरुवातीला विजेवरील ५० गाड्या येणार आहेत.

रत्नागिरी, चिपळूण मार्गावर धावणार

महामंडळाकडून विजेवरील बसेसबाबत माहिती मागविण्यात आली असता, सुरुवातीला पन्नास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर मार्गांवर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. परंतु गाड्यांबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झालेनंतरच योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

आणखी सहा महिने लागणार

- विजेवरील बसेस चालविण्याबाबत राज्य परिवहन महामंडळ सकारात्मक आहे.

- प्रत्येक विभागाकडून सुरुवातीला किती गाड्या चालविणार याचा आढावा घेण्यात येत आहे.

- एकत्रित आढाव्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर विजेवरील बसेस विभागातून सुरू केल्या जातील.

- बसेस मार्गावर धावण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता

विजेवरील बसेस वापरात आणण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. गाड्यांसाठी चार्जिंग पाॅइंटची मध्यवर्ती ठिकाणी सुविधा करण्यात येणार आहे. यामुळे साहजिकच इंधन खर्च तर वाचेल शिवाय प्रदूषणही कमी होईल. महामंडळाचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून भविष्यात याचा फायदा महामंडळाच्या सर्व विभागांना होणार आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

- रत्नागिरी विभागात ५० विजेवरील गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी चार्जिंग स्टेशन मध्यवर्ती ठिकाणी उभारले जाणार आहे.

- शहराजवळील टीआरपी येथील विभागीय कार्यशाळा येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

- रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्याने महामार्गावरील प्रमुख आगारात चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या सूचनेनुसार उभारण्यात येतील.

खर्चात होणार बचत

बस विजेवर चालणार असल्याने त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. परंतु, चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठा कोणत्या दराने होणार याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. रत्नागिरी विभागात लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ७५० गाड्यांद्वारे ४५०० फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे दररोज ४८ ते ५० लाखांचा डिझेल खर्च आहे. प्रवासी भारमानामुळे पन्नास लाख उत्पन्न प्राप्त होत असले तरी त्यातून केवळ इंधन खर्चच भागत होता. अन्य खर्चासाठी महामंडळाकडे मागणी करावी लागत होती; परंतु विजेवरील एसटीमुळे कदाचित खर्चात बचत होण्याची शक्यता आहे. विजेवरील बस किती किलोमीटरपर्यंत धावेल, याबाबत काहीच स्पष्ट माहिती कळविलेली नसल्यामुळे एकूण खर्चाचे ठोकताळे बांधणे अवघड आहे.