शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

५० टक्के बसेस अद्यापही आगारातच : खासगी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १४३३ फेऱ्या सुरू आहेत. खासगी वाहतूक अद्याप बंद असली तरी एस.टी.चे भारमान मात्र घटले आहे.

रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. ४२०० फेऱ्यांपैकी १४३३ फेऱ्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक सुरू होती. मात्र, सध्या ४९ हजार इतकीच प्रवासी वाहतूक होत आहे. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. शिवाय कोरोनाची भीती अद्याप ग्रामीण भागात असल्याने प्रवासी घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असतानाही, एस.टी.चे भारमान मात्र वाढलेले नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

n खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी अद्याप बंद आहेत.

n लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण मार्गावरील खासगी वाहतूकही बंदच आहे.

n कोल्हापूर मार्गावर खासगी वाहतूक करण्यात येते. मात्र, परवानगी नसल्याने वाहतूक बंद आहे.

n चिपळूण ते पोफळी, दापोली ते हर्णै व अन्य मार्गावरील खासगी वाहतूक बंद असल्याने एस.टी.कडे प्रवासी वळला आहे.

n लाॅकडाऊनमध्ये एस.टी.वाहतूक अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू होती.

n अनलाॅकनंतर आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

n प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने निम्म्यापेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.

n बहुतांश गावातून एस.टी सेवा सुरू झाली असली तरी दिवसाला एखादीच फेरी धावत आहे.

n फेऱ्या कमी असल्याने २० टक्के कर्मचारी घरी आहेत.

खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- राहुल पवार, प्रवासी, खंडाळा.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक असून एका दिवसात काही प्रवासी परत फिरतात. मात्र, मोजक्याच बसेस सुरू असल्याने वैद्यकीय किंवा व्यापारी कामासाठी गेलेल्यांना एका दिवसात परत फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- संतोष वाडकर, व्यापारी, रत्नागिरी.