शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

५० टक्के बसेस अद्यापही आगारातच : खासगी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १४३३ फेऱ्या सुरू आहेत. खासगी वाहतूक अद्याप बंद असली तरी एस.टी.चे भारमान मात्र घटले आहे.

रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. ४२०० फेऱ्यांपैकी १४३३ फेऱ्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक सुरू होती. मात्र, सध्या ४९ हजार इतकीच प्रवासी वाहतूक होत आहे. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. शिवाय कोरोनाची भीती अद्याप ग्रामीण भागात असल्याने प्रवासी घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असतानाही, एस.टी.चे भारमान मात्र वाढलेले नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

n खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी अद्याप बंद आहेत.

n लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण मार्गावरील खासगी वाहतूकही बंदच आहे.

n कोल्हापूर मार्गावर खासगी वाहतूक करण्यात येते. मात्र, परवानगी नसल्याने वाहतूक बंद आहे.

n चिपळूण ते पोफळी, दापोली ते हर्णै व अन्य मार्गावरील खासगी वाहतूक बंद असल्याने एस.टी.कडे प्रवासी वळला आहे.

n लाॅकडाऊनमध्ये एस.टी.वाहतूक अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू होती.

n अनलाॅकनंतर आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

n प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने निम्म्यापेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.

n बहुतांश गावातून एस.टी सेवा सुरू झाली असली तरी दिवसाला एखादीच फेरी धावत आहे.

n फेऱ्या कमी असल्याने २० टक्के कर्मचारी घरी आहेत.

खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- राहुल पवार, प्रवासी, खंडाळा.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक असून एका दिवसात काही प्रवासी परत फिरतात. मात्र, मोजक्याच बसेस सुरू असल्याने वैद्यकीय किंवा व्यापारी कामासाठी गेलेल्यांना एका दिवसात परत फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- संतोष वाडकर, व्यापारी, रत्नागिरी.