शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के बसेस अद्यापही आगारातच : खासगी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १४३३ फेऱ्या सुरू आहेत. खासगी वाहतूक अद्याप बंद असली तरी एस.टी.चे भारमान मात्र घटले आहे.

रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. ४२०० फेऱ्यांपैकी १४३३ फेऱ्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक सुरू होती. मात्र, सध्या ४९ हजार इतकीच प्रवासी वाहतूक होत आहे. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. शिवाय कोरोनाची भीती अद्याप ग्रामीण भागात असल्याने प्रवासी घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असतानाही, एस.टी.चे भारमान मात्र वाढलेले नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

n खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी अद्याप बंद आहेत.

n लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण मार्गावरील खासगी वाहतूकही बंदच आहे.

n कोल्हापूर मार्गावर खासगी वाहतूक करण्यात येते. मात्र, परवानगी नसल्याने वाहतूक बंद आहे.

n चिपळूण ते पोफळी, दापोली ते हर्णै व अन्य मार्गावरील खासगी वाहतूक बंद असल्याने एस.टी.कडे प्रवासी वळला आहे.

n लाॅकडाऊनमध्ये एस.टी.वाहतूक अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू होती.

n अनलाॅकनंतर आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

n प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने निम्म्यापेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.

n बहुतांश गावातून एस.टी सेवा सुरू झाली असली तरी दिवसाला एखादीच फेरी धावत आहे.

n फेऱ्या कमी असल्याने २० टक्के कर्मचारी घरी आहेत.

खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- राहुल पवार, प्रवासी, खंडाळा.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक असून एका दिवसात काही प्रवासी परत फिरतात. मात्र, मोजक्याच बसेस सुरू असल्याने वैद्यकीय किंवा व्यापारी कामासाठी गेलेल्यांना एका दिवसात परत फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- संतोष वाडकर, व्यापारी, रत्नागिरी.