शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

५० टक्के बसेस अद्यापही आगारातच : खासगी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेली एस.टी.ची सेवा अनलाॅकमध्ये विस्तारित करण्यात आली. आंतरजिल्हा व ग्रामीण भागातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या ३१० गाड्यांद्वारे १४३३ फेऱ्या सुरू आहेत. खासगी वाहतूक अद्याप बंद असली तरी एस.टी.चे भारमान मात्र घटले आहे.

रत्नागिरी विभागाच्या एकूण ६०० गाड्यांपैकी ३१० गाड्या सुरू आहेत. ४२०० फेऱ्यांपैकी १४३३ फेऱ्या सुरू आहेत. कोरोनापूर्वी दोन लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक सुरू होती. मात्र, सध्या ४९ हजार इतकीच प्रवासी वाहतूक होत आहे. प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असतानाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शालेय फेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली असल्याने शेतकरी कामामध्ये व्यस्त आहेत. शिवाय कोरोनाची भीती अद्याप ग्रामीण भागात असल्याने प्रवासी घराबाहेर पडत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई, पुणे मार्गावर मात्र प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने वाहतूक ठप्प असतानाही, एस.टी.चे भारमान मात्र वाढलेले नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

n खंडाळा, जयगड, सैतवडे मार्गावर खासगी गाड्या मोठ्या प्रमाणावर असल्या तरी अद्याप बंद आहेत.

n लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण मार्गावरील खासगी वाहतूकही बंदच आहे.

n कोल्हापूर मार्गावर खासगी वाहतूक करण्यात येते. मात्र, परवानगी नसल्याने वाहतूक बंद आहे.

n चिपळूण ते पोफळी, दापोली ते हर्णै व अन्य मार्गावरील खासगी वाहतूक बंद असल्याने एस.टी.कडे प्रवासी वळला आहे.

n लाॅकडाऊनमध्ये एस.टी.वाहतूक अत्यावश्यक सेवेंतर्गत सुरू होती.

n अनलाॅकनंतर आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

n प्रवाशांचा प्रतिसाद अल्प लाभत असल्याने निम्म्यापेक्षा कमी फेऱ्या सुरू आहेत.

n बहुतांश गावातून एस.टी सेवा सुरू झाली असली तरी दिवसाला एखादीच फेरी धावत आहे.

n फेऱ्या कमी असल्याने २० टक्के कर्मचारी घरी आहेत.

खंडाळा, जयगड, सैतवडे अंतर रत्नागिरीपासून जास्त आहे. शिवाय या मार्गावरील बसफेऱ्याही मोजक्याच सुरू आहेत. सध्या खासगी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- राहुल पवार, प्रवासी, खंडाळा.

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक असून एका दिवसात काही प्रवासी परत फिरतात. मात्र, मोजक्याच बसेस सुरू असल्याने वैद्यकीय किंवा व्यापारी कामासाठी गेलेल्यांना एका दिवसात परत फिरणे शक्य होत नाही. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- संतोष वाडकर, व्यापारी, रत्नागिरी.