शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘आमआदमी’ना राजापुरात ५ लाख ४० हजारांची मदत

By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST

केंद्र शासनाची योजना : १८ कुटुंबांना मिळाला लाभ

राजापूर : केंद्र शासनाच्या आमआदमी योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील १८ कुटुंबांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजारप्रमाणे ५ लाख ४० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आम आदमी योजना सुरु असून, एक एकरापेक्षा कमी बागायती व पाच एकरपेक्षा कमी जिरायती शेती असलेल्या ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.आमआदमी या योजनेला पात्र असलेल्या कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास ३५ हजार रुपये, दोन्ही डोळे व पाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा व पाय निकामी झाल्यास ३७ हजार रुपयांची मदत देण्यात येते.राजापूर तालुक्यात या योजनेतून दीपिका बिर्जे (शीळ), अश्विनी बेहेरे (चुना कोळवण), रश्मी रघुनंदन नारकर, मंदा महादेव मांजरेकर (जैतापूर), प्रिया प्रकाश कणेरी (अणसुरे), नम्रता नंदकुमार कोरगावकर (वाडीखुर्द), शालिनी चंद्रकांत जाधव (कळसवली), सुप्रिया नांदगावकर (अडविरे), रक्षिता शिरगावकर (तुळसुंदे), प्रमिता मणचेकर (सागवे), अन्नपूर्णा दैत (ओणी), सीमा भाटकर (जांभारी), सुनीता पोवार (धोपेश्वर), जयश्री पडवळ (मूर), रंजना नाडणकर (शिवणे बु.), मीनल लोळगे (गोठणे दोनिवडे), सुलोचना शिंदे (धोपेश्वर) यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आमआदमी योजनेचा लाभ तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर घ्यावा. तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारक लोकांना शासनाकडून आमआदमी योजना राबविण्यात येत आहे.शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजापूर तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक कुटुंबाला ३० हजारांची मदत.दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन व अल्पभूधारकांना मिळतो योजनेचा लाभ.कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास मिळते ३० हजारांची मदत.