शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

पाण्याअभावी अजून ४५ जलशिवारे कोरडी

By admin | Updated: May 3, 2016 00:52 IST

जलशिवार अभियान : प्रत्येक तालुक्यातून ५ गावांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे जलशिवार अभियानाला गतवर्षी प्रारंभ झाला. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कोरडवाहू शेती अभियान व गतिमान पाणलोट कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून पहिल्या टप्यात पाच गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. जिल्ह्यातील १६३३ कामांपैकी १४४५ कामे पूर्ण झाली तरीही जलशिवारे मात्र पाण्याअभावी आजही कोरडीच आहेत.जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यात १६३३ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी १४४५ कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही उर्वरीत १८८ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ३३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. पैकी १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये आत्तापर्यंत जलशिवारांवर खर्च झाला आहे. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. मात्र, सदरची योजना राबवूनही शिवारे मात्र कोरडीच राहिली असून, जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत टँकरग्रस्त गावांची निवड करण्यात आली होती. नऊ तालुक्यांमधील ही टँकरग्रस्त गावे टँकरमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. शासनातर्फे जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पाही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या टप्यात नऊ तालुक्यांमधील प्रत्येकी तीन गावांची निवड करण्यात आलीे आहे. जलशिवार योजनेंतर्गत नदी, ओढ्यांवर विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून या गावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलशिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांबरोबरच अन्य गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.केवळ बंधारे बांधण्यापेक्षा नद्या, विहिरी, ओढे यांच्यातील साचलेला गाळ उपसणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचे झरे पुनर्जीवित होतील व पाण्याच्या पातळीमध्येही वाढ होईल. जलशिवार योजनेच्या पहिल्याच वर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही शिवारे कोरडी पडली आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला तर या शिवारांच्या पाणी पातळीमध्ये निश्चित वाढ होईल. यातून शासनाची कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली जलशिवार योजना यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची झळ : कोट्यवधी पाण्यातजिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी आत्तापर्यंत १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये खर्च करून जलशिवारांची कामे करण्यात आली. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी यासाठी ही कामे तयार करण्यात आली. मात्र, जलशिवारांची कामे करूनही पाणीटंचाईची झळ बसतच आहे.