शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

पाण्याअभावी अजून ४५ जलशिवारे कोरडी

By admin | Updated: May 3, 2016 00:52 IST

जलशिवार अभियान : प्रत्येक तालुक्यातून ५ गावांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे जलशिवार अभियानाला गतवर्षी प्रारंभ झाला. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कोरडवाहू शेती अभियान व गतिमान पाणलोट कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून पहिल्या टप्यात पाच गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. जिल्ह्यातील १६३३ कामांपैकी १४४५ कामे पूर्ण झाली तरीही जलशिवारे मात्र पाण्याअभावी आजही कोरडीच आहेत.जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यात १६३३ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी १४४५ कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही उर्वरीत १८८ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ३३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. पैकी १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये आत्तापर्यंत जलशिवारांवर खर्च झाला आहे. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. मात्र, सदरची योजना राबवूनही शिवारे मात्र कोरडीच राहिली असून, जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत टँकरग्रस्त गावांची निवड करण्यात आली होती. नऊ तालुक्यांमधील ही टँकरग्रस्त गावे टँकरमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. शासनातर्फे जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पाही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या टप्यात नऊ तालुक्यांमधील प्रत्येकी तीन गावांची निवड करण्यात आलीे आहे. जलशिवार योजनेंतर्गत नदी, ओढ्यांवर विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून या गावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलशिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांबरोबरच अन्य गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.केवळ बंधारे बांधण्यापेक्षा नद्या, विहिरी, ओढे यांच्यातील साचलेला गाळ उपसणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचे झरे पुनर्जीवित होतील व पाण्याच्या पातळीमध्येही वाढ होईल. जलशिवार योजनेच्या पहिल्याच वर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही शिवारे कोरडी पडली आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला तर या शिवारांच्या पाणी पातळीमध्ये निश्चित वाढ होईल. यातून शासनाची कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली जलशिवार योजना यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची झळ : कोट्यवधी पाण्यातजिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी आत्तापर्यंत १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये खर्च करून जलशिवारांची कामे करण्यात आली. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी यासाठी ही कामे तयार करण्यात आली. मात्र, जलशिवारांची कामे करूनही पाणीटंचाईची झळ बसतच आहे.