शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी अजून ४५ जलशिवारे कोरडी

By admin | Updated: May 3, 2016 00:52 IST

जलशिवार अभियान : प्रत्येक तालुक्यातून ५ गावांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे जलशिवार अभियानाला गतवर्षी प्रारंभ झाला. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, कोरडवाहू शेती अभियान व गतिमान पाणलोट कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून पहिल्या टप्यात पाच गावांची निवड या अभियानासाठी करण्यात आली. जिल्ह्यातील १६३३ कामांपैकी १४४५ कामे पूर्ण झाली तरीही जलशिवारे मात्र पाण्याअभावी आजही कोरडीच आहेत.जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यात १६३३ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी १४४५ कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही उर्वरीत १८८ कामे सुरू आहेत. या कामांसाठी ३३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. पैकी १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये आत्तापर्यंत जलशिवारांवर खर्च झाला आहे. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. मात्र, सदरची योजना राबवूनही शिवारे मात्र कोरडीच राहिली असून, जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत टँकरग्रस्त गावांची निवड करण्यात आली होती. नऊ तालुक्यांमधील ही टँकरग्रस्त गावे टँकरमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. शासनातर्फे जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पाही निश्चित करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या टप्यात नऊ तालुक्यांमधील प्रत्येकी तीन गावांची निवड करण्यात आलीे आहे. जलशिवार योजनेंतर्गत नदी, ओढ्यांवर विविध प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून या गावांमधील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. मात्र, यावर्षी सरासरीपेक्षा निम्मी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलशिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांबरोबरच अन्य गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.केवळ बंधारे बांधण्यापेक्षा नद्या, विहिरी, ओढे यांच्यातील साचलेला गाळ उपसणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याचे झरे पुनर्जीवित होतील व पाण्याच्या पातळीमध्येही वाढ होईल. जलशिवार योजनेच्या पहिल्याच वर्षी पर्जन्यमानात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही शिवारे कोरडी पडली आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाला तर या शिवारांच्या पाणी पातळीमध्ये निश्चित वाढ होईल. यातून शासनाची कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली जलशिवार योजना यशस्वी झाली, असे म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची झळ : कोट्यवधी पाण्यातजिल्ह्याला पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी आत्तापर्यंत १३ कोटी ३९ लाख ६६ हजार रूपये खर्च करून जलशिवारांची कामे करण्यात आली. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ व्हावी यासाठी ही कामे तयार करण्यात आली. मात्र, जलशिवारांची कामे करूनही पाणीटंचाईची झळ बसतच आहे.