शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

­विभागातील ४४५ बसेस ‘कोरोना फ्री’, प्रवाशांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साथरोगांच्या विषाणूपासून ‘सुरक्षा कवच’ प्राप्त करून देण्यासाठी विभागातील ४४५ गाड्यांना ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करण्यात आले आहे. महामंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांतून स्वागत करण्यात येत आहे.

प्रवाशी गाडीत शिरल्यावर ठिकठिकाणी स्पर्श होत असतो. एस.टी.तील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, चालक केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, प्रवासी येण्या-जाण्याचा मार्ग, आतील बाजूला, सामान कक्षाच्या बाहेरील व आतील बाजूला ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कोरोना व साथरोग पसरविणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण होणार आहे.

महामंडळाने सुरक्षितता जपली

गणेशोत्सवापूर्वी महामंडळाने कोरोना व अन्य साथरोग पसरविणाऱ्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’चा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवापूर्वी नाही; परंतु गणेशोत्सवात कोटिंग पूर्ण करून प्रवाशांची सुरक्षितता जपली आहे.

- रमेश पानगले, कोतवडे

‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे. दर सहा महिन्यांनी कोटिंग केले जाणार आहे. कोरोनाकाळात एस.टी.ने प्रवाशांच्या हितार्थ घेतलेला निर्णय नक्कीच स्तुत्य असून, महामंडळाने सुरक्षित प्रवासाची बांधिलकी राखली आहे.

-सोनम कोलगे, चांदेराई

गणेशोत्सवापूर्वी ‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’ करणारे पथक विभागात दाखल झाले होते. आगारनिहाय गाड्यांची संख्या निश्चित केली होती. त्यानुसार कोटिंगचे काम करण्यात आले आहे. कोटिंगमुळे प्रवासी सुरक्षित झाले आहेत.

- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी

वर्षातून दोनवेळा काेटिंग

रत्नागिरी विभागात एकूण ८३२ गाड्या आहेत. पैकी ४४५ गाड्यांना कोटिंग करण्यात आले आहे. कोटिंगची क्षमता सहा महिने असल्याने पुन्हा सहा महिन्यांनंतर नव्याने कोटिंग केले जाणार आहे. अर्थात वर्षभरात दोन वेळा गाड्यांना कोटिंग केले जाणार आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार उर्वरित गाड्यांचे कोटिंग पूर्ण केले जाणार आहे.

सुरक्षिततेला प्राधान्य

गणेशोत्सवामुळे सर्वसामान्यांची लाल परी म्हणून ओळखली जाणारी एस.टी सध्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. एस.टी.च्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲंटिमायक्रोबिअल जंतुनाशक केमिकल कोटिंग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे महामंडळाने निश्चित केले होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेला महामंडळाने प्राधान्य दिले आहे.

आगारनिहाय कोटिंग

‘ॲंटिमायक्रोबिअल केमिकल कोटिंग’साठी महामंडळाने एका कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वीच कंपनीचे पथक दाखल झाले होते. रत्नागिरी आगारापासून सुरुवात करण्यात आली. राजापूर, लांजा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने नऊ आगारांतील बहुतांशी कोटिंग पूर्ण करण्यात आले आहे.