शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

राजापुरातील ४० हजार रेशनकार्डधारकांना मिळणार माेफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला ...

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला आहे. मात्र, अशा मजूर असलेल्या रेशनकार्डधारकांना दिलासा देताना राज्य सरकारने मे महिन्याचे रेशनदुकानावरील धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना मे महिन्यामध्ये मोफत धान्य मिळणार आहे.

गतवर्षी कोरोना महामारीमुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यावेळी अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला, नोकऱ्या गेल्या. याशिवाय मजुरी मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांची फारच मोठी गैरसोय झाली. यामध्ये सर्वच भरडले गेले. त्यावेळी केंद्र सरकारने मोफत धान्य देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने १५ एप्रिलपासून प्रथम संचारबंदी, नंतर संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी गेल्यावर्षीची पुनरावृत्ती झाली. प्रामुख्याने मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले. सर्वसामान्यांची आबाळ सुरू झाली आहे.

सर्वसामान्यांची आबाळ होऊ नये यासाठी मे महिन्याचे रेशनवरील धान्य मोफत देण्याचा दिलासादायक निर्णय यावेळी राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना होणार आहे. प्राधान्यकम व अंत्योदय गटातील लाभार्थींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून सध्या रेशन ग्राहकांना तीन रुपये दराने माणसी तीन किलो तांदूळ व दोन रुपये दराने माणसी दोन किलो गहू वितरित केले जाते. याच प्रमाणात मे महिन्यासाठी धान्य मोफत दिले जाणार आहे. धान्य वितरणाची कार्यवाही पुरवठा विभागाकडून करण्यात येणार असून, धान्य वितरित केल्याबद्दल रेशन दुकानदारांना सरकारकडून कमिशन दिले जाणार आहे.