शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

राजापुरातील ४० हजार रेशनकार्डधारकांना मिळणार माेफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला ...

राजापूर : कोरोना महामारीमुळे संपूर्ण सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याच परिणाम प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला आहे. मात्र, अशा मजूर असलेल्या रेशनकार्डधारकांना दिलासा देताना राज्य सरकारने मे महिन्याचे रेशनदुकानावरील धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना मे महिन्यामध्ये मोफत धान्य मिळणार आहे.

गतवर्षी कोरोना महामारीमुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यावेळी अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला, नोकऱ्या गेल्या. याशिवाय मजुरी मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्यांची फारच मोठी गैरसोय झाली. यामध्ये सर्वच भरडले गेले. त्यावेळी केंद्र सरकारने मोफत धान्य देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने १५ एप्रिलपासून प्रथम संचारबंदी, नंतर संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. यावेळी गेल्यावर्षीची पुनरावृत्ती झाली. प्रामुख्याने मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले. सर्वसामान्यांची आबाळ सुरू झाली आहे.

सर्वसामान्यांची आबाळ होऊ नये यासाठी मे महिन्याचे रेशनवरील धान्य मोफत देण्याचा दिलासादायक निर्णय यावेळी राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ तालुक्यातील सुमारे ४० हजार रेशनकार्डधारकांना होणार आहे. प्राधान्यकम व अंत्योदय गटातील लाभार्थींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून सध्या रेशन ग्राहकांना तीन रुपये दराने माणसी तीन किलो तांदूळ व दोन रुपये दराने माणसी दोन किलो गहू वितरित केले जाते. याच प्रमाणात मे महिन्यासाठी धान्य मोफत दिले जाणार आहे. धान्य वितरणाची कार्यवाही पुरवठा विभागाकडून करण्यात येणार असून, धान्य वितरित केल्याबद्दल रेशन दुकानदारांना सरकारकडून कमिशन दिले जाणार आहे.