शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरातील ४०० ग्राहक सदाेष वीज मीटर बदलण्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक अर्ज करत आहेत. मात्र, महावितरण ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरवली

: संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक अर्ज करत आहेत. मात्र, महावितरण कंपनीकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. वीज वसुलीबाबत सतर्क असणारी महावितरण कंपनी सदोष मीटर बदलण्याबाबत मात्र चालढकल करत असल्याने सुमारे ४०० वीजग्राहक सदाेष मीटर बदलण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळातील वसुलीबाबत कंपनीकडून आडमुठ्या धोरणाचा अवलंब करत वसुली मोहीम राबविली जात आहे. वीजग्राहकांना सेवा देताना मात्र कंपनी नेहमीच हात आखडता घेत आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्याभोवती झाडे, वेली यांचे साम्राज्य पसरले आहे. तर काही ठिकाणी विद्युत खांब पूर्णपणे धोकादायक अवस्थेत आहेत. तर अनेक वर्षे जुन्या वीजवाहिन्या जनतेच्या जिवाशी खेळतानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबाबत तक्रार केल्यास अपुरे मनुष्यबळ, ठेकेदाराची अकार्यक्षमता अशी अनेक कारणे सांगून ग्राहकांची बोळवण केली जात आहे. गेली दोन वर्षांपासून ग्राहकांचे बंद असणारे सदोष मीटर बदलण्यासाठी ग्राहक कंपनीकडे हेलपाटे मारत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. यावर मात्र कंपनीकडून मीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून चालढकल केली जात आहे.

याबाबत शाखा अभियंता मंदार शिंदे यांना विचारणा केली असता जवळ जवळ चारशे ग्राहक सदोष मीटर बदलण्यासाठी प्रतीक्षेत असून, सतत तक्रारी येत आहेत. मात्र, मीटरचा होणारा पुरवठा हा पुरेसा नसल्याने अडचणी येत आहेत. महिन्याला साधारणत: वीस मीटर मिळत असून, नवीन कनेक्शन देणे, जुने चक्री मीटर बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे यासाठीच ही संख्या पुरेशी नाही. त्यामुळे सदोष मीटर बदलण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. आपण यापूर्वी वरिष्ठांना कळविले असून, पुन्हा एकदा सदोष मीटरची प्रतीक्षा यादी पाठवणार असल्याचे सांगितले.