शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

रत्नागिरी जिल्ह्यात ३९५ कोरोनाबाधित रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १,२३९ झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने, जिल्ह्यात दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सापडलेेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील २७२ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १२३ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १५० रुग्ण, मंडणगड, गुहागरात प्रत्येकी २, दापोलीत ४, खेडमध्ये १, चिपळुणात ३४, संगमेश्वरात ८२, लांजात २३ आणि राजापुरात ४१ रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.७३ टक्के आहे.

जिल्ह्यात खासगी रुग्णालयात ५ तर शासकीय रुग्णालयात ८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ५ जण, चिपळुणातील ३, राजापुरात २ आणि संगमेश्वर, लांजा, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ७ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण ३.४० टक्के आहे.