शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अडीच तासात ३५ तक्रारी दाखल--विजया रहाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:18 IST

रत्नागिरी : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरीत आयोजित केलेल्या जनसुनावणीत केवळ अडीच तासामध्ये ३५ तक्रारी नोंदविल्या गेल्या.

ठळक मुद्दे ‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये जनसुनावणीकौटुंबिक हिंसाचार, पती-पत्नी यातील बेबनाव, सरकारच्या निर्णयाविरोधातील तक्रारी, पोलीस विभाग, लैंगिक अत्याचार आदी प्रकरणांचा समावेशकार्यालयांच्या प्रमुखांवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरीत आयोजित केलेल्या जनसुनावणीत केवळ अडीच तासामध्ये ३५ तक्रारी नोंदविल्या गेल्या. महिला आयोग या सर्व तक्रारींची सुनावणी करूनच जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस महिलावर्गाबाबत सायबर क्राईम, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार आदी अत्याचार घडत आहेत. महिलांना या समस्या घेऊन मुंबईला येणे शक्य नाही. म्हणूनच ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या खुल्या सुनावणीत पीडित महिला आपली तक्रार साध्या कागदावर लिहून आयोगासमोर मांडू शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी रत्नागिरीत गुुरुवारी घेतलेल्या या जनसुनावणीत मुंबई आयोगाकडे आलेल्या २० तक्रारी आणि गुरुवारी दाखल झालेल्या ३५ तक्रारींवर सुनावणी झाली.

यात कौटुंबिक हिंसाचार, पती-पत्नी यातील बेबनाव, सरकारच्या निर्णयाविरोधातील तक्रारी, पोलीस विभाग, लैंगिक अत्याचार आदी प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती रहाटकर यांनी यावेळी दिली.त्या म्हणाल्या की, राज्य महिला आयोग पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. केवळ जनसुनावणी घेणे एवढ्यापुरतेच आयोगाचे काम सीमित नाही, तर महिलांविषयीच्या विविध कायद्यांची माहिती करून घेणे, त्यातील त्रुटींविषयी अभ्यास करून सरकारला सूचना करणे, हेही काम आयोग करीत आहे.

काही वेळा या कायद्याचा वापर करून खोट्या तक्रारी दाखल होऊ शकतात. मात्र, एका प्रकरणावरून सर्वांनाच तसे जोखू नये. अर्थात हा आयोग महिलांच्या संरक्षणासाठी किंवा महिलांविषयीच्या कायद्यासाठी काम करीत असला तरी कायदा निरपेक्ष आहे.त्यामुळे यात जे दोषी असतील त्यांनाच शिक्षा होणार आहे. जे निरपराध आहेत त्यांना न्याय मिळेलच. त्यामुळे पुरुषवर्गानेही भीती बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले.पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी जिल्हा महिला बाल विकास विभाग, संरक्षण अधिकारी, समुपदेशक तसेच या संबंधित विविध यंत्रणा यांच्या एकत्रिकरणाची गरज आहे. यासाठी महिला आयोग प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.अशा आस्थापनांवर कारवाईकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत सरकारी, निमसरकारी, खासगी संस्था तसेच मनोरंजनांची व खेळांची ठिकाणे आणि शैक्षणिक संकुल तसेच जेथे दहापेक्षा जास्त स्त्री किंवा पुरुष काम करतात अशा आस्थापना आदी ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अशा समिती ज्या कार्यालयात अथवा खासगी आस्थापनांमध्ये स्थापन होणार नाहीत, अशा कार्यालयांच्या प्रमुखांवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे रहाटकर यांनी सांगितले.महिला आयोगाकडे तक्रार मांडण्यासाठी आलेल्या रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महिलांच्या तक्रारींवर तत्काळ सुनावणीचे काम सुरू करण्यात आले.