शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परत

By admin | Updated: March 14, 2017 17:55 IST

वित्तीय मान्यता आणि संबंधित प्रवर्गातून एकही अर्ज नाही

रत्नागिरी जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा ३२ लाखाचा निधी परतवित्तीय मान्यता आणि संबंधित प्रवर्गातून एकही अर्ज नाहीआॅनलाईन लोकमतरत्नागिरी : कृषी उन्नती योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी यांत्रिक अवजारे अनुदानावर वितरीत करण्यात येतात. कृषी यांत्रिकीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता ९० लाख ८८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, सर्वसाधारण प्रवर्ग घटकासाठी १९ लाख ५६ हजार खर्च करण्यात येणार होता. वित्तीय मान्यता नसल्यामुळे निधी परत गेला. शिवाय अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गासाठी १२.४६ हजार रूपये निधी मंजूर होता. परंतु या प्रवर्गातून एकही अर्ज नसल्यामुळे निधी परत गेला. एकूण ३२ लाख २ हजार रूपये इतका निधी परत पाठविण्यात आला आहे.कृषी उन्नत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून असली तरी भातपिकानंतरही लोक शेतात अन्य उत्पन्न घेऊ लागले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून सामूदायिक शेतीकडे कल वाढला आहे. सिंचन व्यवस्थेचा फायदा घेत शेतकरी भाजीपाला, दुबार भातपीक तसेच कडधान्य व अन्य पिकांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. पेरणीपूर्वी शेतीची करावी लागणारी मशागत व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ विचारात घेता, कमीत कमी वेळेत, अधिकाधिक उत्पन्न मिळावे व मानवी श्रम कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू झाला आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर स्प्रेअर, ग्रासकटर, मिनी पॉवर विंडरसारखी अवजारे अनुदानावर वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडून एकूण ३८९ प्रस्ताव आले होते. पैकी २१४ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. ट्रॅक्टर २, पॉवर टिलर ४०, भातलावणी मशीन १, ग्रासकटर ४२ वितरीत करण्यात आले असून, त्यासाठी २२ लाख २० हजार रूपयांचा निधी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे. याशिवाय मांडकी-पालवण येथे कृषी अवजारे बँक स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी ४ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्राप्त अनुदान ५८ लाख ३६ हजारांपैकी आतापर्यंत २६ लाख २० हजार रूपये खर्च करण्यात आले असून, ३२ लाख १६ हजार रूपये शिल्लक आहेत. यावर्षी ३२ लाख १६ हजार रूपये अद्याप शिल्लक आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चअखेर यांत्रिकीकरणासाठी आलेला निधी खर्च करण्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे खरेदीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच प्राप्त निधीपैकीच निधी शिल्लक राहिला आहे. सर्वसाधारण प्रवर्ग घटकासाठी १९ लाख ५६ हजार खर्च करण्यात येणार होता. मात्र, वित्तीय मान्यता नसल्यामुळे निधी परत गेला. शिवाय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी १२.४६ हजार रूपये निधी मंजूर होता. परंतु या प्रवर्गातून यांत्रिकीकरणासाठी एकही अर्ज आला नसल्यामुळे निधी परत गेला आहे. एकूण ३२ लाख २ हजार इतका निधी परत गेला असून, शिल्लक ३२ लाख १६ हजार रूपये खर्च करण्यासाठी कृषी विभागाची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)कृषी उन्नत्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी परवानगी दिली जाते. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ४० टक्के अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.