शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

सानुग्रह योजनेचे ३१ लाभार्थी

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना : शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यभूत

रत्नागिरी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. शालेय विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. २००३पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्या २८, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान वितरीत करण्यात आले. शासनाने २००३मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत होता. त्यानंतर सर्व रक्कम विमा कंपनीला देण्यात येत असे. अशा विद्यार्थ्यांला अपघात झाला तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असे. मात्र, योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षात या योजनेत बदल करण्यात आले. विम्याच्या हप्त्याची विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम शासनाकडून भरण्यात येत आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला किरकोळ अपघात झाला, तर अनुदान देण्यात येत नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्याना गरज असतानाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यालाच मदतीचा हातभार लाभतो. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाला प्रत्येकी ७५ हजार, तर अपंगत्व आलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याला ३० हजार रुपये देण्यात येतात.ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांची घरे यातील अंतर लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच वर्षात २८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर तीन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. २०१०-११ मध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले. २०११-१२ मध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू , २०१२ - १३ मध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१३ - १४मध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१४ - १५ मध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू व दोघांना अपंगत्व, २०१५ - १६ मध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या २८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तर तीन अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)तेरा वर्षे : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ठरतेय मोलाचीराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेने गेल्या १३ वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे हे प्रमाण नगण्य असले तरीही ज्या विद्यार्थ्यांना या घटनेतून जावे लागले, त्यांच्यासाठी ही योजना आणि या योजनेतून होणारे आर्थिक सहाय्य मोलाचे ठरत आहे.