शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सानुग्रह योजनेचे ३१ लाभार्थी

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना : शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यभूत

रत्नागिरी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. शालेय विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. २००३पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्या २८, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान वितरीत करण्यात आले. शासनाने २००३मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत होता. त्यानंतर सर्व रक्कम विमा कंपनीला देण्यात येत असे. अशा विद्यार्थ्यांला अपघात झाला तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असे. मात्र, योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षात या योजनेत बदल करण्यात आले. विम्याच्या हप्त्याची विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम शासनाकडून भरण्यात येत आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला किरकोळ अपघात झाला, तर अनुदान देण्यात येत नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्याना गरज असतानाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यालाच मदतीचा हातभार लाभतो. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाला प्रत्येकी ७५ हजार, तर अपंगत्व आलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याला ३० हजार रुपये देण्यात येतात.ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांची घरे यातील अंतर लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच वर्षात २८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर तीन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. २०१०-११ मध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले. २०११-१२ मध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू , २०१२ - १३ मध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१३ - १४मध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१४ - १५ मध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू व दोघांना अपंगत्व, २०१५ - १६ मध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या २८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तर तीन अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)तेरा वर्षे : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ठरतेय मोलाचीराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेने गेल्या १३ वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे हे प्रमाण नगण्य असले तरीही ज्या विद्यार्थ्यांना या घटनेतून जावे लागले, त्यांच्यासाठी ही योजना आणि या योजनेतून होणारे आर्थिक सहाय्य मोलाचे ठरत आहे.