शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सानुग्रह योजनेचे ३१ लाभार्थी

By admin | Updated: May 25, 2016 00:30 IST

राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना : शालेय विद्यार्थ्यांना सहाय्यभूत

रत्नागिरी : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी लाभार्थी ठरले आहेत. शालेय विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास विद्यार्थी अथवा त्याच्या कुटुंबीयांना मदतनिधी देण्यासाठी शासनाने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. २००३पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. गेल्या पाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्या २८, तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान वितरीत करण्यात आले. शासनाने २००३मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी एक रुपया घेण्यात येत होता. त्यानंतर सर्व रक्कम विमा कंपनीला देण्यात येत असे. अशा विद्यार्थ्यांला अपघात झाला तर अपघातग्रस्त विद्यार्थ्यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत असे. मात्र, योजना सुरू केल्यानंतर दोन वर्षात या योजनेत बदल करण्यात आले. विम्याच्या हप्त्याची विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम शासनाकडून भरण्यात येत आहे. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याला किरकोळ अपघात झाला, तर अनुदान देण्यात येत नाही. त्यामुळे गोरगरीब, गरजू विद्यार्थ्याना गरज असतानाही अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यालाच मदतीचा हातभार लाभतो. या योजनेंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाला प्रत्येकी ७५ हजार, तर अपंगत्व आलेल्या लाभार्थी विद्यार्थ्याला ३० हजार रुपये देण्यात येतात.ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांची घरे यातील अंतर लांब असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच वर्षात २८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तर तीन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. २०१०-११ मध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर एका विद्यार्थ्याला अपंगत्व आले. २०११-१२ मध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू , २०१२ - १३ मध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१३ - १४मध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, २०१४ - १५ मध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू व दोघांना अपंगत्व, २०१५ - १६ मध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मृत्यूमुखी पडलेल्या २८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना, तर तीन अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात आले. (प्रतिनिधी)तेरा वर्षे : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ठरतेय मोलाचीराजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेने गेल्या १३ वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे हे प्रमाण नगण्य असले तरीही ज्या विद्यार्थ्यांना या घटनेतून जावे लागले, त्यांच्यासाठी ही योजना आणि या योजनेतून होणारे आर्थिक सहाय्य मोलाचे ठरत आहे.