शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आंबा उत्पादकांचे तीनशे कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2015 00:37 IST

परतफेडीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : यंदा नुकसानीचा मोठा फटका बसलेल्या आंबा व्यवसायासाठी बागायतदारांनी ३०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. या कर्जाच्या परतफेडीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रांवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे यातील ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रांवरील पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रांवर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे त्यातील ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दरवर्षी आंबा, काजू बागायतदार औषध फवारणी, खते, वाहतूक या सर्व गोष्टींसाठी कर्ज घेतात. यंदा राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांमधून जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बागायतदारांनी ३०० कोटींचे कर्ज (कॅश क्रेडिट) घेतले आहे. आंब्याचे नुकसान झाल्यामुळे सरकारने भरपाईपेक्षा १०० टक्के कर्जमाफी करावी, अशी मागणी आंबा बागायतदार संघटनेने केली होती. सात-बारावर असलेल्या अनेक नावांमुळे याआधी नुकसानभरपाईचे ४८ कोटी रुपये परत गेले आहेत. त्यामुळे भरपाई देताना महसुली निकष न लावता घेतलेले कर्ज शंभर टक्के माफ करावे, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य करण्याऐवजी सरकारने जिल्ह्याला ७९ कोटी रुपये भरपाई जाहीर केली आहे. त्यापैकी ३३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्तही झाला आहे. कर्जमाफीचा मुद्दा कोठेही पुढे न आल्याने बागायतदारांना ३० जूनअखेर कर्जाची पूर्ण परतफेड करणे गरजेचे होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. कर्जमाफीचा निर्णय झालेला नसला तरी झालेले नुकसान लक्षात घेता आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीत चर्चेअंती कर्ज परतफेडीसाठी ३० जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बागायतदार निराश नुकसानभरपाईसाठी आंबा पिकाला हेक्टरी भरपाईचा निकष लावू नये, अशी मागणी असतानाही हेक्टरी २५ हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाल्यामुळे आंबा उत्पादक निराश झाले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई नाकारण्याची चर्चा आता बागायतदारांमध्ये सुरू आहे.