शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादकांचे तीनशे कोटींचे कर्ज

By admin | Updated: June 28, 2015 00:37 IST

परतफेडीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : यंदा नुकसानीचा मोठा फटका बसलेल्या आंबा व्यवसायासाठी बागायतदारांनी ३०० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. या कर्जाच्या परतफेडीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रांवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे यातील ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रांवरील पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रांवर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसामुळे त्यातील ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दरवर्षी आंबा, काजू बागायतदार औषध फवारणी, खते, वाहतूक या सर्व गोष्टींसाठी कर्ज घेतात. यंदा राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांमधून जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बागायतदारांनी ३०० कोटींचे कर्ज (कॅश क्रेडिट) घेतले आहे. आंब्याचे नुकसान झाल्यामुळे सरकारने भरपाईपेक्षा १०० टक्के कर्जमाफी करावी, अशी मागणी आंबा बागायतदार संघटनेने केली होती. सात-बारावर असलेल्या अनेक नावांमुळे याआधी नुकसानभरपाईचे ४८ कोटी रुपये परत गेले आहेत. त्यामुळे भरपाई देताना महसुली निकष न लावता घेतलेले कर्ज शंभर टक्के माफ करावे, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य करण्याऐवजी सरकारने जिल्ह्याला ७९ कोटी रुपये भरपाई जाहीर केली आहे. त्यापैकी ३३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्तही झाला आहे. कर्जमाफीचा मुद्दा कोठेही पुढे न आल्याने बागायतदारांना ३० जूनअखेर कर्जाची पूर्ण परतफेड करणे गरजेचे होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. कर्जमाफीचा निर्णय झालेला नसला तरी झालेले नुकसान लक्षात घेता आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीत चर्चेअंती कर्ज परतफेडीसाठी ३० जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बागायतदार निराश नुकसानभरपाईसाठी आंबा पिकाला हेक्टरी भरपाईचा निकष लावू नये, अशी मागणी असतानाही हेक्टरी २५ हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाल्यामुळे आंबा उत्पादक निराश झाले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई नाकारण्याची चर्चा आता बागायतदारांमध्ये सुरू आहे.