शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईचे ३० कोटी बाकी

By admin | Updated: August 31, 2014 00:34 IST

आंबा नुकसान : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

रत्नागिरी : थ्रीप्स (फुलकिडे)मुळे आंबा पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले असून, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक राहिला आहे. ही भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबापिक धोक्यात आले होते. त्यानंतर शासनाने बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीची भरपाई आली आहे. मात्र आता ही भरपाई घेऊन जाण्यास बागायतदार पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. निम्म्यापेक्षा अधिक भरपाईचे अजून वितरण होणे बाकी आहे. त्यामुळे ही भरपाई निर्धारित वेळेत न नेल्यास ती शासनाच्या तिजोरीत पुन्हा जाण्याची शक्यता आहे.सन २०११-१२मधील आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून जिल्ह्याला ५१ कोटी ७७ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. पैकी २१ कोटी ५२ लाखाचे वाटप पूर्ण झाले आहे. मात्र, ३० कोटी २५ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांचे मदतीची रक्कम शिल्लक राहिली आहे. त्याचबरोबर एकाच जमिनीत तसेच बागायतीत एकापेक्षा जास्त सहहिस्सेदार असल्यामुळे त्यांच्या परवानगी उपलब्ध होईपर्यंत भरपाई दिली जात नाही. कोकणात सहहिस्सेदाराचे जबाब मिळत नसल्याने आणि अनेक बागायतींमध्ये सहहिस्सेदाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरपाई नेण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षे भरपाई येते, मात्र त्यातील बहुतांशी रक्कम पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या गणेशोत्सवासाठी अनेक मुंबईकर आपल्या गावाला आले आहेत. अशा सर्व खातेदार तसेच सहहिस्सेदारांनी आंबा झाडांची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक खाते क्रमांकाची छायांकित प्रत यासह कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक अथवा मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. संबंधित निधीचे वाटप लवकर न झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी २०११-१२ मधील आंबा नुकसानभरपार्इंची रक्कम घेतलेली नाही, त्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयांशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)निम्मा निधी शिल्लकनुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध.जिल्ह्यात २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक.सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव.निधीचे वाटप लवकर न झाल्यास भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती.जिल्ह्यतील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी गेल्याने मदतीची रक्कम शिल्लक असल्याचा अंदाज.