शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईचे ३० कोटी बाकी

By admin | Updated: August 31, 2014 00:34 IST

आंबा नुकसान : कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

रत्नागिरी : थ्रीप्स (फुलकिडे)मुळे आंबा पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले असून, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक राहिला आहे. ही भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबापिक धोक्यात आले होते. त्यानंतर शासनाने बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीची भरपाई आली आहे. मात्र आता ही भरपाई घेऊन जाण्यास बागायतदार पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. निम्म्यापेक्षा अधिक भरपाईचे अजून वितरण होणे बाकी आहे. त्यामुळे ही भरपाई निर्धारित वेळेत न नेल्यास ती शासनाच्या तिजोरीत पुन्हा जाण्याची शक्यता आहे.सन २०११-१२मधील आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून जिल्ह्याला ५१ कोटी ७७ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. पैकी २१ कोटी ५२ लाखाचे वाटप पूर्ण झाले आहे. मात्र, ३० कोटी २५ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी आहेत. त्यामुळे त्यांचे मदतीची रक्कम शिल्लक राहिली आहे. त्याचबरोबर एकाच जमिनीत तसेच बागायतीत एकापेक्षा जास्त सहहिस्सेदार असल्यामुळे त्यांच्या परवानगी उपलब्ध होईपर्यंत भरपाई दिली जात नाही. कोकणात सहहिस्सेदाराचे जबाब मिळत नसल्याने आणि अनेक बागायतींमध्ये सहहिस्सेदाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरपाई नेण्यास शेतकरी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षे भरपाई येते, मात्र त्यातील बहुतांशी रक्कम पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या गणेशोत्सवासाठी अनेक मुंबईकर आपल्या गावाला आले आहेत. अशा सर्व खातेदार तसेच सहहिस्सेदारांनी आंबा झाडांची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक खाते क्रमांकाची छायांकित प्रत यासह कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक अथवा मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. संबंधित निधीचे वाटप लवकर न झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी २०११-१२ मधील आंबा नुकसानभरपार्इंची रक्कम घेतलेली नाही, त्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालयांशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)निम्मा निधी शिल्लकनुकसान भरपाई वाटपासाठी ५१.७७ कोटीचा निधी उपलब्ध.जिल्ह्यात २१.५२ कोटी नुकसान भरपाईचे वितरण, ३०.२५ कोटीचा निधी शिल्लक.सन २०११-१२मध्ये आंबा पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव.निधीचे वाटप लवकर न झाल्यास भरपाईची रक्कम परत जाण्याची भीती.जिल्ह्यतील अनेक खातेदार, सहहिस्सेदार बाहेरगावी गेल्याने मदतीची रक्कम शिल्लक असल्याचा अंदाज.