शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ३० रुग्णवाहिका घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात ...

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५-५ ॲम्ब्युलन्सचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली असून त्या ॲम्ब्युलन्स एप्रिल महिन्यात मिळणार आहेत. खनिकर्म विभागाच्या रॉयल्टीमधून काही टक्के निधी सार्वजनिक कारणांसाठी वापरला जातो. या निधीतून रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी १५-१५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेने गाड्यांसाठी जशी तातडीने हालचाल केली, तशी हालचाल जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य विभागाने तातडीने राबविल्यास या गाड्या लवकर उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले. १०८ रुग्णवाहिका कोल्हापूरला जात नसल्यानेच शासनाच्या दोन कार्डियाक ॲम्ब्युलन्स घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

राज्यामध्ये फिजिशियन, आरोग्य कर्मचारी कमी असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ३,५०० आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवकांची भरती होत आहे. त्यामधून रत्नागिरी जिल्ह्यालाही आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक मिळतील. मात्र, किती कमी आहेत याचा आकडा जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यास सांगतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची सध्या गरज नाही. ज्या दिवशी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी यंत्रणा ही रुग्णालये ताबडतोब ताब्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी खोटी माहिती देत असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करायची तो निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री घेतील. तसेच त्यांच्याकडून काही चुका होत असतील तर त्या निदर्शनास आणून द्या, असेही त्यांनी सांगितले.

आठ नवे डॉक्टर येणार

रत्नागिरी जिल्ह्याला आठ नवीन वैद्यकीय अधिकारी मिळणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी आठ जणांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ते लवकरच दाखल होतील, असे ते म्हणाले.

आरटीपीसीआर मोफत करणार

व्यापारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चाचणी व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची तक्रार केली जात होती. त्यामुळे ती मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.