शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी ३० रुग्णवाहिका घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात ...

रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५-५ ॲम्ब्युलन्सचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली असून त्या ॲम्ब्युलन्स एप्रिल महिन्यात मिळणार आहेत. खनिकर्म विभागाच्या रॉयल्टीमधून काही टक्के निधी सार्वजनिक कारणांसाठी वापरला जातो. या निधीतून रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी १५-१५ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेने गाड्यांसाठी जशी तातडीने हालचाल केली, तशी हालचाल जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य विभागाने तातडीने राबविल्यास या गाड्या लवकर उपलब्ध होऊ शकतील, असे ते म्हणाले. १०८ रुग्णवाहिका कोल्हापूरला जात नसल्यानेच शासनाच्या दोन कार्डियाक ॲम्ब्युलन्स घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

राज्यामध्ये फिजिशियन, आरोग्य कर्मचारी कमी असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ३,५०० आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवकांची भरती होत आहे. त्यामधून रत्नागिरी जिल्ह्यालाही आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक मिळतील. मात्र, किती कमी आहेत याचा आकडा जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यास सांगतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची सध्या गरज नाही. ज्या दिवशी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी यंत्रणा ही रुग्णालये ताबडतोब ताब्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी खोटी माहिती देत असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करायची तो निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री घेतील. तसेच त्यांच्याकडून काही चुका होत असतील तर त्या निदर्शनास आणून द्या, असेही त्यांनी सांगितले.

आठ नवे डॉक्टर येणार

रत्नागिरी जिल्ह्याला आठ नवीन वैद्यकीय अधिकारी मिळणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी आठ जणांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार ते लवकरच दाखल होतील, असे ते म्हणाले.

आरटीपीसीआर मोफत करणार

व्यापारी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चाचणी व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची तक्रार केली जात होती. त्यामुळे ती मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.