शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

तब्बल २५१ शाळा ठरल्या दुरूस्तीत नापास

By admin | Updated: March 22, 2017 23:38 IST

जिल्हा परिषद : साडेपाच कोटींच्या निधीची आवश्यकता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुमारे २५१ प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरुन शिक्षणाचे धडे घेत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ४६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे घडलेल्या दुर्घटनेचा विचार करता नादुरूस्त शाळांचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे. सुमारे दीड लाख विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, ९००० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्हा परिषदेच्या १०० प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत चालली असली तरी त्यांना नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये काही शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ जिल्ह्यात सुमारे २५१ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ या नादुरुस्त शाळांची दुरुस्ती वेळीच होणे आवश्यक आहे़ या शाळाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला डीपीडीसीकडून निधी देण्यात येतो. मात्र, तोही निधी अपुरा पडत असल्याने दरवर्षी नादुरुस्त शाळांच्या संख्येत भर पडत आहे. या शाळा वेळीच दुरुस्त झाल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)