शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तब्बल २५१ शाळा ठरल्या दुरूस्तीत नापास

By admin | Updated: March 22, 2017 23:38 IST

जिल्हा परिषद : साडेपाच कोटींच्या निधीची आवश्यकता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुमारे २५१ प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या आहेत. या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरुन शिक्षणाचे धडे घेत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ४६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथे घडलेल्या दुर्घटनेचा विचार करता नादुरूस्त शाळांचा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे. सुमारे दीड लाख विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, ९००० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्हा परिषदेच्या १०० प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी होत चालली असली तरी त्यांना नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असून, त्या कौलारु आहेत़ त्यामुळे शाळांच्या जुन्या इमारतींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे़ त्यामध्ये काही शाळांच्या छताचे लाकडी वासे तुटल्याने छतच मोडकळीस आले आहेत़ तसेच भिंतींना तडे गेल्याने धोकादायक स्थितीतही विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ जिल्ह्यात सुमारे २५१ प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ या नादुरुस्त शाळांची दुरुस्ती वेळीच होणे आवश्यक आहे़ या शाळाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला डीपीडीसीकडून निधी देण्यात येतो. मात्र, तोही निधी अपुरा पडत असल्याने दरवर्षी नादुरुस्त शाळांच्या संख्येत भर पडत आहे. या शाळा वेळीच दुरुस्त झाल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)