शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

कशेडी ते धामणदिवी दरम्यान २५ हजार वृक्षांची होणार कत्तल

By admin | Updated: February 11, 2016 23:51 IST

खेड तालुका : पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी

श्रीकांत चाळके -- खेड --मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेग घेत आहे. चौपदरीकरणासाठी जमीन संपादन करणे आणि किंमत ठरविणे आदी महत्त्वाच्या कामांना कमालीचा वेग आला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील महामार्गालगतच्या कशेडी ते धामणदिवी दरम्यान सुमारे २५ हजार वृक्षांची कत्तल करण्याचे आदेश येथील वन विभागाला देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे. त्यामुळे चौपदरीकरण कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असेच म्हणावे लागेल.इंदापूर ते झाराप दरम्यान ३६६ किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरण कामाचा नारळ फुटल्यानंतर या कामाचा वेग काहीसा कमी झाला होता. मात्र, केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा रत्नागिरी दौरा आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सातत्याने होत असलेल्या चौपदरीकरण कामासाठीच्या महत्वपूर्ण बैठका यामुळे कामाला वेग आल्याचे दिसत आहे. मुंबई येथे मंत्रालयात झालेली चौपदरीकरणासंबंधातील बैठक आणि त्यानंतर तातडीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झालेली बैठक यांमधील तातडीच्या उपाययोजनांच्या आधारे चौपदरीकरण कामातील अडथळा दूर होण्यास मदत झाली आहे. जमिनीचे मूल्यांकन करणे आणि मार्गातील अडथळे दूर करण्यासंबंधीत या बैठकीत चर्चा झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष तातडीने तोडण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी ते धामणदिवी या भागात विविध प्रकारची सुमारे २५ हजार जुनाट झाडे आहेत. त्यातील काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत, तर काही झाडे प्रवाशांना सावली देणारी आहेत. वन विभागाने या झाडांची गणना पूर्ण केली आहे. नुकतीच या झाडांची मोजणी झाली असून, ती तोडण्यासाठी वन विभागाने जोरदार हालचाल केली आहे. याकरिता वनविभाग आता मजुरांच्या प्रतीक्षेत आहे. विविध प्रकराची झाडे आणि फळांची झाडेही यामध्ये आहेत. या झाडांचे मूल्यांकन करून होणारी किंमत संबंधित शेतकरी अथवा मालकांनाच मिळणार आहे. त्यामुळे वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता याच कामामध्ये गुंतून राहणार आहेत.