शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ टक्के ग्रामपंचायती इंटरनेटविना

By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST

जिल्ह्यातील २१४ म्हणजेच २५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये अजूनही इंटरनेटची सुविधा नसल्याचे दिसून येते

 रहिम दलाल -रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यात येत असतानाच जिल्ह्यातील २१४ म्हणजेच २५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये अजूनही इंटरनेटची सुविधा नसल्याचे दिसून येते. जगाला जवळ आणणारी इंटरनेटसेवाच उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायती जगापासून कोसो लांब राहिल्या आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीची थेट माहिती जिल्हा परिषद, मंत्रालयाला मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आला आहे. संगणक युग गावोगावी संगणक, मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी इंटरनेट पोहोचले आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायती इंटरनेट सुविधांपासून अजूनही दूर आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना तसेच शासनाकडून मिळणार्‍या विकास कामांच्या अनुदान यांची माहिती अनेकदा ग्रामपंचायतींकडे तत्काळ मागविण्यात येते. अशावेळी इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती शासनाला पाठविण्यात येते. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये डाटा इंट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना ४५०० रुपये मानधन दिले जाते. मात्र, तेही वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरुच आहे. जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी करण्यात आलेली नाही. इंटरनेट नसल्याने डाटा इंट्री आॅपरेटर्सची मोठी दमछाम होत आहे. त्यासाठी अन्य ग्रामपंचायतीमध्ये किंवा खाजगी सायबर कॅफेमध्ये जाऊन आॅपरेटरना काम करावे लागत आहे. त्यासाठी पदरचे पैसे घालवावे लागतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आॅनलाईन कामकाजाला मोठ खिळ बसला आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीची माहिती थेट मंत्रालयात किंवा जिल्हा परिषदेत बसून एका क्लिकवर घेता यावी, यासाठी शासनाकडून आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करुन त्यांची आॅनलाईन जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना कोणत्याही योजनेची किंवा संबंधित ग्रामपंचायतीची तात्काळ माहिती उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळण्यासाठीच आॅनलाईन असणे अवश्यक आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संगणक असून रेंज मिळत नसल्याने आॅनलाईन प्रक्रियेत मोठा व्यत्यय येत आहे.