शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५ टक्के ग्रामपंचायती इंटरनेटविना

By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST

जिल्ह्यातील २१४ म्हणजेच २५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये अजूनही इंटरनेटची सुविधा नसल्याचे दिसून येते

 रहिम दलाल -रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यात येत असतानाच जिल्ह्यातील २१४ म्हणजेच २५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये अजूनही इंटरनेटची सुविधा नसल्याचे दिसून येते. जगाला जवळ आणणारी इंटरनेटसेवाच उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायती जगापासून कोसो लांब राहिल्या आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीची थेट माहिती जिल्हा परिषद, मंत्रालयाला मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात आला आहे. संगणक युग गावोगावी संगणक, मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी इंटरनेट पोहोचले आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायती इंटरनेट सुविधांपासून अजूनही दूर आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना तसेच शासनाकडून मिळणार्‍या विकास कामांच्या अनुदान यांची माहिती अनेकदा ग्रामपंचायतींकडे तत्काळ मागविण्यात येते. अशावेळी इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती शासनाला पाठविण्यात येते. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये डाटा इंट्री आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना ४५०० रुपये मानधन दिले जाते. मात्र, तेही वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरुच आहे. जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींना इंटरनेटची जोडणी करण्यात आलेली नाही. इंटरनेट नसल्याने डाटा इंट्री आॅपरेटर्सची मोठी दमछाम होत आहे. त्यासाठी अन्य ग्रामपंचायतीमध्ये किंवा खाजगी सायबर कॅफेमध्ये जाऊन आॅपरेटरना काम करावे लागत आहे. त्यासाठी पदरचे पैसे घालवावे लागतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आॅनलाईन कामकाजाला मोठ खिळ बसला आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीची माहिती थेट मंत्रालयात किंवा जिल्हा परिषदेत बसून एका क्लिकवर घेता यावी, यासाठी शासनाकडून आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करुन त्यांची आॅनलाईन जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना कोणत्याही योजनेची किंवा संबंधित ग्रामपंचायतीची तात्काळ माहिती उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळण्यासाठीच आॅनलाईन असणे अवश्यक आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संगणक असून रेंज मिळत नसल्याने आॅनलाईन प्रक्रियेत मोठा व्यत्यय येत आहे.