शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बँका चार दिवस बंद राहिल्याने जिल्ह्यातील २५ कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

रत्नागिरी : दोन दिवस आलेली सुटी आणि त्यांना जोडून दोन दिवस बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस राष्ट्रीय ...

रत्नागिरी : दोन दिवस आलेली सुटी आणि त्यांना जोडून दोन दिवस बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस राष्ट्रीय बँका बंद राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे २५ कोटी रूपयांची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली.

राष्ट्रीय बँकांना दर शनिवार आणि रविवार अशी सुटी असते. यावेळी १३ आणि १४ मार्च या दोन दिवशी शनिवार आणि रविवार होता. त्यानंतर सोमवार, दि. १५ आणि मंगळवार दि. १६ रोजी राष्ट्रीय बँकांनी देशस्तरावर संप पुकारला होता. केंद्र सरकारने दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली व त्याला आक्षेप घेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँकिंग उद्योगातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेने १५ व १६ मार्च २०२१ रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला. देशभरातील जवळपास १० लाख बँक अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी होते. यात जिल्ह्यातील सुमारे १५ राष्ट्रीय बँकांच्या सर्व शाखांमधील अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते.

या संपामध्ये अधिकारी वर्गाच्या चार संघटना व कर्मचारी वर्गाच्या पाच संघटना अशा एकूण नऊ संघटना व बँकिग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण देशातील व राज्यातीलही बँकिंग उद्योग ठप्प झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातीलही राष्ट्रीय बँका दोन दिवसांची सुटी आणि दोन दिवस संप असे सलग चार दिवस बंद राहिल्या. त्यामुळे या कालावधीत बँकांचे सर्व आर्थिक व्यवहार बंद राहिले. यात रोख रक्कम तसेच क्लिअरिंग व्यवहारही बंद राहिले. सर्वच आर्थिक व्यवहार बंद राहिल्याने या सर्व बँकांमधून होणारी एकूण २५ कोटींची उलाढाल या कालावधीत ठप्प झाली.