शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गुहागर तालुक्यात २४ विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत ...

गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यासाठी गुहागर तालुक्यात तब्बल २३ ग्रामपंचायतींनी शाळेच्या इमारतीत, तर एका ग्रामपंचायतीने रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.

तालुक्यातील कोतळूक, वेलदूर, शीर, साखरीआगर, आबलोली, पाटपन्हाळे, जानवळे, काताळे, पालपेणे, वेळणेश्वर, चिंद्रावळे, आरे, वेळंब, कोंडकारुळ, असगोली, पालशेत, तळवली, कुडली, पडवे, नरवण, चिखली, हेदवी, अडूर अशा २३ गावांनी शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अंजनवेल येथे युसूफ मेहर अली सेंटर रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत भाडेतत्त्वावर विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे.

याबाबत गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी सांगितले की, गृह अलगीकरणातील लोक बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा विशेष उपचारांची गरज नाही, अशा कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा विलगीकरण कक्षावर ग्राम कृती दलाचे लक्ष असेल. यामध्ये आरोग्य विभागासह प्रशासकीय स्तरावरील मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आदींपैकी एक संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. शक्य तिथे महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कंपनी मदत निधी तसेच दानशूर व्यक्तींकडून आवश्यक मदत स्वीकारली जाणार आहे. एखाद्याची व्यवस्था होत नसल्यास ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून कृती दलाच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केली जाणार आहे.

सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी, मागील काही दिवसांचा अनुभव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढल्यास या विलगीकरण कक्षांचा मोठा उपयोग होणार आहे. सध्या वेळणेश्वर कोविड सेंटर येथे ८० व आरजीपीपीएल सेंटर येथे १५ रुग्णांची व्यवस्था होते आहे. गुहागर नगरपंचायत माध्यमातूनही वेगळे विलगीकरण कक्ष करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.

.....................

शासनाची विलगीकरण कक्षाची संकल्पना चांगली आहे; मात्र यामध्ये विविध विभागांचा सामावेश असल्याने यामध्ये चांगला समन्वय असणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांची गैरसोय होऊ शकते. ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना, कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात येण्यास तयार नसतात. अशावेळी एका माणसामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होताना दिसत आहे. शासनाने संशयित रुग्णांना शासनाच्या विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक केले पाहिजे, तरच याचा खरा उपयोग होईल. अनेकवेळा गावात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांची माहिती ग्रामपंचायतीला दिली जात नाही.

संजय पवार, सरपंच, पाटपन्हाळे