शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

गुहागर तालुक्यात २४ विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत ...

गुहागर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवून वाढता प्रसार रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यासाठी गुहागर तालुक्यात तब्बल २३ ग्रामपंचायतींनी शाळेच्या इमारतीत, तर एका ग्रामपंचायतीने रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.

तालुक्यातील कोतळूक, वेलदूर, शीर, साखरीआगर, आबलोली, पाटपन्हाळे, जानवळे, काताळे, पालपेणे, वेळणेश्वर, चिंद्रावळे, आरे, वेळंब, कोंडकारुळ, असगोली, पालशेत, तळवली, कुडली, पडवे, नरवण, चिखली, हेदवी, अडूर अशा २३ गावांनी शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. अंजनवेल येथे युसूफ मेहर अली सेंटर रुग्णालयाच्या स्वतंत्र इमारतीत भाडेतत्त्वावर विलगीकरण कक्ष करण्यात आले आहे.

याबाबत गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी सांगितले की, गृह अलगीकरणातील लोक बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा विशेष उपचारांची गरज नाही, अशा कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा विलगीकरण कक्षावर ग्राम कृती दलाचे लक्ष असेल. यामध्ये आरोग्य विभागासह प्रशासकीय स्तरावरील मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आदींपैकी एक संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. शक्य तिथे महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कंपनी मदत निधी तसेच दानशूर व्यक्तींकडून आवश्यक मदत स्वीकारली जाणार आहे. एखाद्याची व्यवस्था होत नसल्यास ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून कृती दलाच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केली जाणार आहे.

सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी, मागील काही दिवसांचा अनुभव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढल्यास या विलगीकरण कक्षांचा मोठा उपयोग होणार आहे. सध्या वेळणेश्वर कोविड सेंटर येथे ८० व आरजीपीपीएल सेंटर येथे १५ रुग्णांची व्यवस्था होते आहे. गुहागर नगरपंचायत माध्यमातूनही वेगळे विलगीकरण कक्ष करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.

.....................

शासनाची विलगीकरण कक्षाची संकल्पना चांगली आहे; मात्र यामध्ये विविध विभागांचा सामावेश असल्याने यामध्ये चांगला समन्वय असणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांची गैरसोय होऊ शकते. ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना, कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात येण्यास तयार नसतात. अशावेळी एका माणसामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होताना दिसत आहे. शासनाने संशयित रुग्णांना शासनाच्या विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक केले पाहिजे, तरच याचा खरा उपयोग होईल. अनेकवेळा गावात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांची माहिती ग्रामपंचायतीला दिली जात नाही.

संजय पवार, सरपंच, पाटपन्हाळे