शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

रत्नागिरी : आषाढ महिना सुरू होताच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षीपासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र, ...

रत्नागिरी : आषाढ महिना सुरू होताच गणेशोत्सवाचे वेध लागतात. गतवर्षीपासून कोरोनाचे वातावरण असल्याने भाविकांच्या उत्साहाला ग्रहण लागले आहे. मात्र, सध्या रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंधही कमी होत आहेत. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कोरोनाने आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी गावी येणाऱ्यांची संख्या वाढेल, असे अपेक्षित आहे. त्यासाठी कोकणात २,२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.

परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मुंबई येथे ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकांतून दि. ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून, चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. दि. १६ जुलै २०२१पासून त्यासाठीच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.

दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस. टी. धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २,२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील, असे परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी दि. ४ ते १० सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील, तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार असून, चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेही एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून, सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एस. टी.ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मार्गावर तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत, असेही परब यांनी सांगितले.

................................

कोकण रेल्वे फुल्ल

कोकण रेल्वेने आपल्या जादा गाड्यांची घोषणा आधीच केली आहे. तीन महिने आधी त्याचे आरक्षण सुरु होत असल्याने ते पूर्णही झाले आहे. आता एस. टी. महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांसाठी मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.