शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २२ कोटींचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ...

रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अंतिम अहवाल तयार झाला असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ काेटी २२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

२१ व २२ जुलैला पडलेल्या अति मुसळधार पावसाने माेठ्या नद्यांना पूर आला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमध्ये भुस्खलन झाले. गावांचा संपर्क तुटला, रस्ते खचले, पूल वाहून गेले. चिपळूण, खेड शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली होती. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा अंतिम अहवाल नुकसान जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान चिपळूण बांधकाम विभागाचे १११ कोटी २६ लाख रुपये आहे. रत्नागिरी विभागाचे ६९ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यात ८५८ रस्त्यांचे १३५ कोटी रुपयांचे, १०५ साकवांचे २१ काेटी ९२ लाख रुपये, १४ इमारतींचे १ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अजूनही अनेक गावांतील रस्ते खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ कोटी २२ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनसह आपत्कालीन निधीतून मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह बाधित गावातील सदस्यांनी आढावा घेऊन घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणीही केली होती.