शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २२ कोटींचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ...

रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, जिल्हा परिषदेचे १८१ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अंतिम अहवाल तयार झाला असून, तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ काेटी २२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

२१ व २२ जुलैला पडलेल्या अति मुसळधार पावसाने माेठ्या नद्यांना पूर आला. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमध्ये भुस्खलन झाले. गावांचा संपर्क तुटला, रस्ते खचले, पूल वाहून गेले. चिपळूण, खेड शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली होती. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा अंतिम अहवाल नुकसान जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान चिपळूण बांधकाम विभागाचे १११ कोटी २६ लाख रुपये आहे. रत्नागिरी विभागाचे ६९ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यात ८५८ रस्त्यांचे १३५ कोटी रुपयांचे, १०५ साकवांचे २१ काेटी ९२ लाख रुपये, १४ इमारतींचे १ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अजूनही अनेक गावांतील रस्ते खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २२ कोटी २२ लाख रुपयांची गरज असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडून प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनसह आपत्कालीन निधीतून मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह बाधित गावातील सदस्यांनी आढावा घेऊन घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणीही केली होती.