शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चिपळूणमध्ये २० आरोग्य पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात महापुराचे पाणी ओसरले असले तरी तेथे आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार ...

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात महापुराचे पाणी ओसरले असले तरी तेथे आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सतर्क राहून २० आरोग्य पथके चिपळूण शहरासह आजूबाजूच्या परिसरात कार्यरत ठेवली आहेत.

चिपळूण, खेड शहरांमध्ये गेल्या दोन महापुराने हाहाकार उडाला होता. संपूर्ण चिपळूण शहर व आजूबाजूच्या परिसराला महापुराच्या पाण्याने वेढले होते. महापुराच्या पाण्याने अन्नधान्य भिजून खराब झाले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तरीही अनेकांपर्यंत मदतच पोहोचलेली नाही.

अचानक आलेल्या महापुराचे पाणी ओसरले आहे; मात्र चिपळूण परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत. तसेच सगळीकडे कचरा पसरला आहे. पाणी ओसरल्याने आता लोक घरातील चिखल साफ करीत आहेत.

कचरा, चिखलामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग चिपळूणकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. चिपळूणमध्ये २० आरोग्य पथके तत्काळ कामाला लागली आहेत. त्यातील १५ आरोग्य पथके शहरी भागात तर ५ आरोग्य पथके ग्रामीण भागात कार्यरत ठेवण्यात आली आहेत. या आरोग्य पथकांमध्ये डाॅक्टर, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेचा समावेश करण्यात आला आहे. या आरोग्य पथकांच्या साथीला आशासेविकांनाही देण्यात आले आहे. तसेच पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला आहे.

-----------------------------

जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून तत्काळ मदतकार्य करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये औषधसाठ्यासह आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,

जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद, रत्नागिरी.