शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

करमणूक करापोटी प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख

By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST

लांजा अव्वल : जिल्ह्यात रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालय अव्वल

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेला ३ कोटी ९५ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ३ कोटी ९५ लाख इतक्या उद्दिष्टापैकी २ कोटी १५ लाख ९४ हजार रूपयांच्या महसूलची (५४.६६ टक्के) भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक महसूल रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने (३० लाख ९१ हजार, ५०.५१ टक्के) इतका मिळविला आहे, तर सर्व तालुक्यात लांजा अव्वल (१ लाख १८ हजार, ६९.४१ टक्के) आहे.जिल्हा करमणूक कर शाखेला २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता ३ कोटी ९५ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्यासह तीन उपविभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे. उपविभाग दापोलीत मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभाग चिपळूणमध्ये चिपळूण, गुहागर, देवरूख (संगमेश्वर) या तीन तालुक्यांचा, तर रत्नागिरी उपविभागात रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे.यावर्षी संपूर्ण जिल्ह्याला ३ कोटी ९५ लाख रूपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर २ कोटी १५ लाख ९४ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात रत्नागिरी उपविभाग पहिला आणि दापोली, चिपळूण अनुक्रमे द्वितीय व तृतीय आहेत. जिल्ह्यात लांजा तालुका प्रथम असून, त्यापाठोपाठ संगमेश्वर आणि गुहागर अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. एप्रिलमध्ये लोकसभा आणि त्यापाठोपाठ चारच महिन्यांनी विधानसभा निवडणूक आल्याने वसुली गतवर्षी पेक्षा कमी झाली आहे. सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ४७ लाख ४४ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ४८ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्च २०१५ पर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास या शाखेकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीरत्नागिरी५४.३०२७.४१५०.४८लांजा१.७०१.१८६९.३९राजापूर५.२०२.३२४४.६२रत्नागिरी उपविभाग६१.२०३०.९१५०.५१एकूण१४७ ६८.५०४६.६०डी. टी. एच२४८१४७.४४५९.४५एकूण३९५२१५.९४५४.६६तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीमंडणगड१.७५०.३७२१.१४दापोली६ २.६८४४.६७खेड२०९.३५४६.७५दापोली उपविभाग२७.७५१२.४०४४.६८चिपळूण४५१७.८५३९.६७गुहागर८४.४९५४.८८संगमेश्वर५.०५२.९५३९.६७चिपळूण उपविभाग५८.०५२५.१९४३.३९ंगतवर्षी उद्दिष्टापेक्षा २७ टक्के अधिक वसुली मार्च अखेर झाली होती. मात्र, आता आॅक्टोबरपर्यंत काही तालुक्यांची वसुली ५० टक्केही झाली नाही. कारण एप्रिल आणि आॅक्टोबरमध्ये निवडणुका आल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. मात्र, यावर्षीही मार्चअखेर जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती नक्कीच होईल.- रवींद्र खानविलकर,सहायक करमणूक कर अधिकारी