शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
2
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
3
७३ हजार सॅलरी असणाऱ्या पत्नीने पतीकडे मागितली पोटगी; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल
4
Women's World Cup 2025 Prize Money : महिला क्रिकेटला 'अच्छे दिन'; पुरुषांपेक्षाही अधिक बक्षीस
5
ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर
6
सगळ्यांसमोर गळाभेट, एकाच गाडीतून प्रवास अन् हास्याचा खळखळाट! पुतिन-मोदींची मैत्री पाहून ट्रम्प यांचं टेन्शन वाढणार
7
Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
8
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?
9
'पवित्र रिश्ता'मधली माझी पहिली मैत्रीण..., प्रियाच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावुक
10
सरकारी निर्णयाचा फटका! 'ही' कंपनी ६० कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; CEO म्हणाले दुसरा पर्याय नाही
11
मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग
12
"मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे आम्ही सकारात्मकपणे बघतोय, पण..."; फडणवीसांनी सांगितला नेमका पेच!
13
मानसिक आजारी आईने २ मुलांना ३ वर्षे घरात कोंडले, त्यांनी सूर्यप्रकाशही पाहिला नाही
14
मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त
15
वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले
16
अबब! किराणा दुकानदाराला १४१ कोटींची टॅक्स नोटीस; तपासात समोर आला धक्कादायक प्रकार 
17
Maharashtra Rains: पिके गेली, घरही गेले, पंचनामे करा; लवकर मदत द्या!
18
158 KM रेंज अन् स्मार्ट फिचर्स; TVS ने लॉन्च केली आपली नवीन EV स्कूटर, किंमत फक्त...
19
अफगाणिस्तानात भूकंपाने हाहाकार, ६२२ जणांचा मृत्यू; गावे उद्ध्वस्त, इमारती ढिगाऱ्यात बदलल्या
20
Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका

रस्त्यांच्या कामासाठी १८ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी ...

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी मिळणारा निधी तोकडा असल्याने हे काम पूर्ण होत नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनकडे ८० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ६,७४९ कि.मी. लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. यापैकी सुमारे ३० ते ४० टक्के लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषदेचे बहुतांश रस्ते डांबरी आहेत. पावसाळ्यात हे रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच यावर्षी नेहमीच्या तुलनेत रस्त्यांची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. मात्र, निधी तोकडा असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न यावर्षी ऐरणीवर आला आहे. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेंतर्गतचा ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांचा प्रश्न यावेळी प्रकर्षाने निकाली काढण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणपणे जिल्हा प्रमुख मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, जिल्हा परिषदेला अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळतो.

जिल्हा परिषदेला रस्त्याच्या कामांसाठी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात सुमारे १२ कोटी रुपये मंजूर झाले होते. रस्त्यांची दुरुस्ती पाहता हा निधी अपुरा पडणारा आहे. जिल्हा परिषदेने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांची मागणी जिल्हा नियोजनकडे केली आहे.