शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

रस्त्यांच्या कामासाठी १८ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी ...

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी मिळणारा निधी तोकडा असल्याने हे काम पूर्ण होत नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनकडे ८० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ६,७४९ कि.मी. लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. यापैकी सुमारे ३० ते ४० टक्के लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषदेचे बहुतांश रस्ते डांबरी आहेत. पावसाळ्यात हे रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच यावर्षी नेहमीच्या तुलनेत रस्त्यांची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. मात्र, निधी तोकडा असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न यावर्षी ऐरणीवर आला आहे. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेंतर्गतचा ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांचा प्रश्न यावेळी प्रकर्षाने निकाली काढण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणपणे जिल्हा प्रमुख मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, जिल्हा परिषदेला अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळतो.

जिल्हा परिषदेला रस्त्याच्या कामांसाठी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात सुमारे १२ कोटी रुपये मंजूर झाले होते. रस्त्यांची दुरुस्ती पाहता हा निधी अपुरा पडणारा आहे. जिल्हा परिषदेने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांची मागणी जिल्हा नियोजनकडे केली आहे.