शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७३ नवे रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार १७३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १८८ बाधित ...

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार १७३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले; तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १८८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १,७६६ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात दिवसभरात ५ आणि मागील दिवसात आणखी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चिपळूण तालुक्यातील ३ रुग्ण, खेड, रत्नागिरीत प्रत्येकी २ रुग्ण आणि दापोली, गुहागर, राजापूर या तालुक्यांमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण २,१८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.९६ टक्के आहे. मागील आठवड्यामध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर ३.१५ टक्के होता.

जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात ४ रुग्ण, दापोलीत ९ रुग्ण, खेडमध्ये २२, गुहागरात १६, चिपळुणात ३७, संगमेश्वरात २७, रत्नागिरीत २४, लांजात १४ आणि राजापुरात २० रुग्ण सापडले. यात आरटीपीसीआर चाचणीतील १११ रुग्ण, तर ॲन्टिजन चाचणीतील ६२ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या ७३,८४३ झाली आहे. लक्षणे नसलेले १,२४१, तर लक्षणे असलेले ३४६ रुग्ण आहेत. जिल्ह्यात १,७६६ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६९,८९१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४.६५ टक्के आहे.