शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १६ हजार मातांना मिळाली सुरक्षेची ऊब

By admin | Updated: July 10, 2016 01:47 IST

-माता सुरक्षा --दिन विशेष

शोभना कांबळे -- रत्नागिरीमातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वाेत्कट असा क्षण असतो. पण ते लाभताना स्त्रीला खडतर परिस्थितीतून जावे लागत असते. गर्भारपण आणि प्रसुती दरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे मातांचा मृत्यू होण्याचा धोका असतो, म्हणूनच या भावी मातेची प्रसुती सुलभ व्हावी, तसेच तिला आरोग्यविषयक सुविधा वेळेवर मिळावी, यासाठी शासनातर्फे तिच्या घरापासून रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी ‘जननी शिशु सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत शासकीय वाहनांची (१०२ क्रमांकाची) मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी या योजनेचा लाभ जिल्ह््यातील १६,१७० मातांना मिळाला. पूर्वी घरच्याघरीच प्रसुती होत असे. मात्र, गुंतागुंतीच्यावेळी वेळेवर औषधोपचार उपलब्ध होत नसल्याने त्या मातेचा किंवा तिच्या अर्भकाचा मृत्यू होत असे. त्यामुळे बाळंतपण काळात होणाऱ्या मातांच्या आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. शहरापेक्षा ग्रामीण भागातून प्रसुतीगृहात आणणे वाहनाच्या अभावी अडचणीचे होत असे. त्यातच आर्थिक परिस्थितीमुळेही तिला सुविधा मिळणे अवघड होत असे. प्रसंगी बाळ - बाळंतीण दगावण्याचाही धोका असे. मात्र, आता आरोग्य विभागाने भावी मातेचे आरोग्य, तिची प्रसुती सुलभ व्हावी आणि तिचे बाळ सुखरूप निपजावे, यासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे ‘१०२ क्रमांकाची’ शासकीय वाहनाची सुविधा. ‘जननी शिशु सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत शासनातर्फे तिच्या घरापासून रूग्णालयापर्यंत आणण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शासकीय वाहनाचा आधार जिल्ह््यातील १६,१७० मातांना मिळाला आहे. या सुविधेमुळे आता मातेला प्रसुतीसाठी वेळेवर रूग्णालयात दाखल केल्याने तिची प्रसुती सुलभ होऊ लागली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील गरोदर मातांना या वाहनाचा लाभ मिळू लागला आहे. या वाहनांद्वारे गेल्या वर्षभरात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या ७१५२ मातांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. तर एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात नेण्यासाठी २७०९ महिलांना या वाहनांचा आधार मिळाला आहे. तसेच प्रसुतीसाठी घरापासून रूग्णालयापर्यंत जाण्यासाठी तब्बल ६३०९ मातांनी लाभ घेतला आहे. मातेचा आहार आणि आरोग्य यादृष्टीने तिला आर्थिक आधार देण्याच्या हेतूने ‘जननी सुरक्षा’ योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील मातांना ७०० रूपये आणि शहरी भागातील मातांना ६०० रूपये, अशी आर्थिक मदत देण्यात येते. आरोग्य विभागाच्या या सुविधांमुळे भावी मातांना आणि त्यांच्या बालकांसाठी हे सुरक्षाकवच ठरत आहे.तसं पाहिलं तर मातेच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, हे त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर अवलंबून असतं. पण पहिलटकरीण असेल तर सासरी आणि माहेरी तिची चांगली काळजी घेतली जाते. मात्र, पहिल्या दोन मुली असतील, तर तिच्याकडे दुर्लक्ष होते. पण आता समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावलाय. पूर्वी बाळंतपणात अडचण आली तरंच तिला हॉस्पीटलमध्ये आणले जायचे. पण आता अगदी झोपडपट्टीतील महिलाही गर्भारपणात तपासणीसाठी येते. एकंदरीत आता प्रसुतीपूर्व तपासणी आणि काळजी याबाबत सतर्कता आलीय, याचे श्रेय शासनाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाबरोबरच प्रामुख्याने घरोघरी जाऊन गर्भार मातांमध्ये त्यांच्या आरोग्याची जाणीव निर्माण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना द्यायला हवे.- डॉ. मनिषा वंडकर, स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ, रत्नागिरी