शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

बचत गटातील १३४ महिलांना सव्वा कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

रत्नागिरी : उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १३४ महिलांना १ ...

रत्नागिरी : उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १३४ महिलांना १ कोटी ३७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अनुदान रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

कोरोना कालावधीत अनेक उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. काही उद्याेगांना आर्थिक उभारी मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भार पॅकेज जाहीर केले. गावागावात अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटे-छोटे अन्न प्रक्रिया उद्योग करून त्यावर कुटुंबांची गुजराण होते. यामध्ये पापड, लोणची तयार करणे, गरे तळणे, आंबा व काजू प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा सहभाग असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहाय्यता समूहातील एका सदस्याला ४० हजार रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. गटातील १० सदस्यांना मिळून ४ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या लाीासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत आवाहन केले होते. जास्तीत जास्त गटातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. घाणेकर यांनी नियोजन केले होते. प्रभाग संघात कार्यरत उमेदच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना महिलांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे ४०० महिलांनी ॲानलाईन नोंदणी केली होती. राज्याला पहिल्या टप्प्यात ९ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले असून, रत्नागिरी जिल्ह्याला १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. याचे वितरण १३४ लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.