शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

महिला रुग्णालयातील १४० रुग्णांची मदार केवळ २८ कर्मचाऱ्यांवर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

रत्नागिरी : येथील जिल्हा महिला रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी १४० खाटांची सोय आहे. सध्या हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरलेले ...

रत्नागिरी : येथील जिल्हा महिला रुग्णालयात सध्या कोरोना रुग्णांसाठी १४० खाटांची सोय आहे. सध्या हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरलेले असून या रुग्णांची सेवा केवळ २८ कर्मचारी करीत आहेत. स्वत:च्या आरोग्याचा धोका पत्करून हे कर्मचारी रात्रं-दिवस या रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांना अंघोळ घालणे, जेवण भरविणे, अगदी डायपर बदलणे ही कामे अगदी आनंदाने करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आधीच आरोग्य यंत्रणेत डाॅक्टर आणि कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली आहे. या मोहिमेत दोन वेळा लसीकरण करण्यात येत आहे. ही धावपळ सुरू असतानाच शिमगोत्सवात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा संसर्ग जलदगतीने वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढू लागली असून लोक तपासणीसाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळताना आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहेत.

गेल्या ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच अपुरे बांधकाम असलेल्या महिला रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले. मुळात जिल्हा रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असतानाही, कोरोना युद्धजन्य परिस्थितीतही अपुऱ्या कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा देत, या रुग्णालयाचे नाव उंचावले. शिमगोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने या रुग्णालयात आता खाटांची संख्या १४० करण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयात डाॅक्टर्स, परिचारिका यांची संख्या अपुरी आहे. असे असतानाही येथील कर्मचारी रुग्णांना अंघोळ घालणे, त्यांना भरविणे, त्यांची बेडशीट बदलणे अगदी डायपर बदलणे ही कामे त्यांच्या अगदी संपर्कात राहून करीत आहेत.

सध्या या रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सेवा देणाऱ्या डाॅक्टर्स आणि परिचारिकांची संख्या अपुरी पडत आहे. या रुग्णालयाला स्वतंत्र फिजिशियन, भूलतज्ज्ञ यांची स्वतंत्र गरज आहे. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरच ही सेवा देत आहेत.

अतिदक्षता विभागात २० खाटा आहेत. प्रत्येक रुग्णासाठी एक परिचारिका असणे अत्यावश्यक आहे. मात्र, सध्या या कक्षात ११ परिचारिका ही जबाबदारी सांभाळत आहेत. ऑक्सिजन कक्षात ६६, तर अलगीकरण कक्षात ५४ खाटा आहेत. या दोन्ही कक्षात तीन रुग्णांमागे एका परिचारिकेची गरज असते. मात्र, या दोन्हींसाठी केवळ १७ परिचारिका कार्यरत आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळावर या रुग्णालयाची सेवा रात्रं-दिवस सुरू आहे.

चौकट

रुग्णांच्या नातेवाईकांकडून या कर्मचाऱ्यांना सहकार्य होते. मात्र, काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून या कर्मचाऱ्यांना मनस्ताप दिला जातो. या रुग्णालय आवारात अस्वच्छता केली जाते. त्यामुळे काही वेळा या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्यासारखे वाटते. मात्र, काहींच्या नातेवाईकांकडून कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानही दिला जातो. त्यामुळे नव्या उभारीने हे कर्मचारी पुन्हा रुग्णसेवेत व्यग्र होतात.