शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

तब्बल १२० वर्षांच्या लक्ष्मी आजींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:33 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावातील गवळीवाडीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सखाराम भोजने या १२० व्या वर्षांच्या आजीने साऱ्यांचा निरोप ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावातील गवळीवाडीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सखाराम भोजने या १२० व्या वर्षांच्या आजीने साऱ्यांचा निरोप घेतला. फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा १२० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आताच्या घडीला जिल्ह्यातील त्या सर्वांत वयस्क होत्या.

३ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वर तालुक्यातील चांदिवणे गवळीवाडी येथे होते. घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मी' ठेवले गेले. खरोखरच त्या भोजने घराण्यात लक्ष्मी बनून आल्या. कष्टातून त्यांनी भोजने घराण्याचा उत्कर्ष केला. लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामांत झोकून दिले. भातशेतीबरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत अनेक वर्षे केली. त्यांना ४ मुले आणि ३ मुली आहेत.

पती निधनानंतर खचून न जाता, संसाराची सारी सूत्रे लक्ष्मी यांनी स्वत:कडे घेतली आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. मुलांनीही शिक्षण घेताघेता शेतीत मदत केली. नोकरी-व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला-मुलींचे लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. पुढे नातवंडे झाली. मात्र सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. त्यातच त्यांच्या चार मुलांपैकी दोन मुलांचे निधन झाले. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरूच ठेवली. कष्ट हेच त्यांच्या निरोगी आरोग्याचे रहस्य ठरले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी २००१ मध्ये वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळी सर्व कुटुंबाने जल्लोषात त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.

वयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या घरातील कामे करीतच होत्या. गेल्या पाच-सहा वर्षांत वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे, असे प्रकार जाणवू लागले होते. मात्र, शेवटपर्यंत त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करीत होत्या. ३ मे रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.