शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

कोकण परिमंडलात १२ लाख थकबाकी

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

महावितरण : कृषी संजीवनी योजनेची बिले थकली

रत्नागिरी : शेतकऱ्यांकरिता कृषी पंपासाठी सुरु असलेल्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील तीन हजार ३६४ शेतकऱ्यांकडे १२ लाख १ हजार २३७ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबरअखेर बिल भरणाऱ्या ग्राहकांना एकूण बिलाच्या ५० टक्के सवलत महावितरणने जाहीर केली आहे.कृषी संजीवनी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १५५४ ग्राहकांकडे ६ लाख ४२ हजार ११३ रुपयांची थकबाकी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८१० ग्राहकांकडे ५ लाख ५९ हजार १२४ रुपयांची थकबाकी राहिली आहे. कृषी पंपाचे बिल त्रैमासिक पद्धतीने देण्यात येते. परंतु तेही शेतकऱ्यांकडून भरण्यासाठी विलंब होत असलेला दिसून येत आहे. चिपळूण विभागामध्ये ४७६ ग्राहकांकडे २ लाख ७ हजार २१४, खेड विभागातील ४५७ ग्राहकांकडे २ लाख ८ हजार ५८६, रत्नागिरी विभागामध्ये ६२१ ग्राहकांकडे २ लाख २६ हजार ३१३ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागात ८५७ ग्राहकांकडे २ लाख ६१ हजार २९४, तर कणकवली विभागात ९५३ ग्राहकांकडे २ लाख ९७ हजार ८२९ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १० टक्के ग्राहक थकबाकीदार असून, ९० टक्के ग्राहकांकडून नियमित वीजबिल भरण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी बिलाची ५० टक्के रक्कम भरु शकतात किंवा २० टक्केप्रमाणे दोन हप्ते व १० टक्क्याने एक हप्ता भरण्याची सुविधा महावितरणने देऊ केली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. पैसे न भरून कारवाई होण्यापेक्षा त्यांनी बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)