शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

कोकण परिमंडलात १२ लाख थकबाकी

By admin | Updated: September 5, 2014 23:30 IST

महावितरण : कृषी संजीवनी योजनेची बिले थकली

रत्नागिरी : शेतकऱ्यांकरिता कृषी पंपासाठी सुरु असलेल्या कृषी संजीवनी योजनेंतर्गत कोकण परिमंडलातील तीन हजार ३६४ शेतकऱ्यांकडे १२ लाख १ हजार २३७ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबरअखेर बिल भरणाऱ्या ग्राहकांना एकूण बिलाच्या ५० टक्के सवलत महावितरणने जाहीर केली आहे.कृषी संजीवनी योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १५५४ ग्राहकांकडे ६ लाख ४२ हजार ११३ रुपयांची थकबाकी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८१० ग्राहकांकडे ५ लाख ५९ हजार १२४ रुपयांची थकबाकी राहिली आहे. कृषी पंपाचे बिल त्रैमासिक पद्धतीने देण्यात येते. परंतु तेही शेतकऱ्यांकडून भरण्यासाठी विलंब होत असलेला दिसून येत आहे. चिपळूण विभागामध्ये ४७६ ग्राहकांकडे २ लाख ७ हजार २१४, खेड विभागातील ४५७ ग्राहकांकडे २ लाख ८ हजार ५८६, रत्नागिरी विभागामध्ये ६२१ ग्राहकांकडे २ लाख २६ हजार ३१३ रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागात ८५७ ग्राहकांकडे २ लाख ६१ हजार २९४, तर कणकवली विभागात ९५३ ग्राहकांकडे २ लाख ९७ हजार ८२९ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. १० टक्के ग्राहक थकबाकीदार असून, ९० टक्के ग्राहकांकडून नियमित वीजबिल भरण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरी बिलाची ५० टक्के रक्कम भरु शकतात किंवा २० टक्केप्रमाणे दोन हप्ते व १० टक्क्याने एक हप्ता भरण्याची सुविधा महावितरणने देऊ केली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. पैसे न भरून कारवाई होण्यापेक्षा त्यांनी बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)