शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

११५४ शाळांमधील विद्यार्थी प्रगत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभागाची आघाडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ११५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तांनी ज्ञानरचना वादानुसार शिक्षण पध्दतीचा वापर करुन राज्यातील किती शाळा प्रगत झाल्या याचा आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त शाळा १०० टक्के प्रगत ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८०० शाळांमधील विद्यार्थी प्रगत झाले आहेत. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वशिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्याने पहिल्या दोन क्रमांकात स्थान पटकावले आहे. ही परंपरा कायम राखत शिक्षणामध्ये जिल्ह्यातील मुले राज्यात हुशार असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरीतील शाळांनी राबविलेली शिक्षण पध्दती अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ बीटमधील ३० प्रगत शाळांना भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दौरे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृती, उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम, लेखी चाचणी याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादनाची वेळावेळी पडताळणी शाळास्तरावर करुन त्यांना प्रगत बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादाचा अवलंब करुन जिल्ह्यात एकूण ११५४ शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगडात ८५, दापोलीत ८०, खेडमध्ये ९४, चिपळुणात १९५, गुहागरात १०२, संगमेश्वर २१६, रत्नागिरीमध्ये १८१, लांजात ७७ व राजापूरमध्ये १२४ शाळा प्रगत झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)