शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

११५४ शाळांमधील विद्यार्थी प्रगत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभागाची आघाडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ११५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तांनी ज्ञानरचना वादानुसार शिक्षण पध्दतीचा वापर करुन राज्यातील किती शाळा प्रगत झाल्या याचा आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त शाळा १०० टक्के प्रगत ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८०० शाळांमधील विद्यार्थी प्रगत झाले आहेत. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वशिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्याने पहिल्या दोन क्रमांकात स्थान पटकावले आहे. ही परंपरा कायम राखत शिक्षणामध्ये जिल्ह्यातील मुले राज्यात हुशार असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरीतील शाळांनी राबविलेली शिक्षण पध्दती अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ बीटमधील ३० प्रगत शाळांना भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दौरे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृती, उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम, लेखी चाचणी याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादनाची वेळावेळी पडताळणी शाळास्तरावर करुन त्यांना प्रगत बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादाचा अवलंब करुन जिल्ह्यात एकूण ११५४ शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगडात ८५, दापोलीत ८०, खेडमध्ये ९४, चिपळुणात १९५, गुहागरात १०२, संगमेश्वर २१६, रत्नागिरीमध्ये १८१, लांजात ७७ व राजापूरमध्ये १२४ शाळा प्रगत झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)