शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

११५४ शाळांमधील विद्यार्थी प्रगत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभागाची आघाडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ११५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तांनी ज्ञानरचना वादानुसार शिक्षण पध्दतीचा वापर करुन राज्यातील किती शाळा प्रगत झाल्या याचा आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त शाळा १०० टक्के प्रगत ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८०० शाळांमधील विद्यार्थी प्रगत झाले आहेत. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वशिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्याने पहिल्या दोन क्रमांकात स्थान पटकावले आहे. ही परंपरा कायम राखत शिक्षणामध्ये जिल्ह्यातील मुले राज्यात हुशार असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरीतील शाळांनी राबविलेली शिक्षण पध्दती अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ बीटमधील ३० प्रगत शाळांना भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दौरे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृती, उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम, लेखी चाचणी याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादनाची वेळावेळी पडताळणी शाळास्तरावर करुन त्यांना प्रगत बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादाचा अवलंब करुन जिल्ह्यात एकूण ११५४ शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगडात ८५, दापोलीत ८०, खेडमध्ये ९४, चिपळुणात १९५, गुहागरात १०२, संगमेश्वर २१६, रत्नागिरीमध्ये १८१, लांजात ७७ व राजापूरमध्ये १२४ शाळा प्रगत झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)