शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पायाभूत आराखड्यासाठी १०५ कोटी

By admin | Updated: December 16, 2014 23:47 IST

महावितरण कंपनी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

रत्नागिरी : महावितरणकडून पायाभूत आराखडा दोनचे नियोजन करण्यात आले आहे. या आराखड्यांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १०५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नवीन उपकेंद्र बांधणी, उच्चदाब, लघुदाब वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मरची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्रांची कामे सुरू आहेत. कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, त्यापैकी वालोपे उपकेंद्राला अद्याप जागा मिळालेली नाही. याशिवाय ३५२ किमी लघुदाब व ४१५ किमी उच्चदाब वाहिन्या, ३८२ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. तसेच १५१ जुन्या रोहित्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. काही उपकेंद्रात नवीन रोहित्र बसविली जाणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पायाभूत आराखडा दोनकरिता ३६ कोटी ८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. पायाभूत आराखडा एकमध्ये जिल्ह्याला तीन उपकेंद्र मंजूर होती. पैकी जामसंडे उपकेंद्र सुरू झाले आहे, तर रामगड व आचरा उपकेंद्राची कामे अद्याप सुरू आहेत. याशिवाय आराखडा दोनमध्ये नवीन चार उपकेंद्र मंजूर झाली आहेत. फणसगाव (देवगड), भुईवाडा (वैभववाडी), माजगाव (सावंतवाडी), अडेरी (वेंगुर्ला) याठिकाणी उपकेंद्र प्रस्तावित आहेत. ५९२ किमी उच्चदाब, २६८ किमी लघुदाब वाहिन्या, ४३० नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. याशिवाय जुन्या ३५ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहेत.कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. चाफे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवीसह आसपासची गावे समाविष्ट होतात. कोतवडे उपकेंद्रामुळे चाफे उपकेंद्राचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. (प्रतिनिधी)