शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढत असताना बरेच आप्तस्वकीय आपण गमावले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढत असताना बरेच आप्तस्वकीय आपण गमावले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील करबुडे आणि जाकादेवी येथे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बाेलत हाेते.

पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शिवसेना पक्षातर्फे भागातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत १८ ते २९ वयोगटातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

मंत्री सामंत म्हणाले की, आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींनी लस घेतली नाही अशा व्यक्ती आणि आपल्या विभागातील व्यक्तींची माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांकडे द्यावी, जेणेकरून आपल्या भागातील नागरिकांचे लसीकरण करणे सोयीचे ठरेल. करबुडे पंचायत समिती गणामध्ये ४६० तर देऊड पंचायत समिती गणामध्ये ५२५ अशा एकूण ९८५ नागरिकांचे शनिवारी लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यामुळे आपले कुटुंब, गाव, तालुका, जिल्हा व राज्य सुरक्षित राहण्यास मदत होईल. कायमस्वरूपी मास्क तोंडाला राहू नये यासाठी संपूर्ण लसीकरण हा संकल्प घेऊन या भागातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, सदस्य महेश म्हाप, महिला जिल्हा उपसंघटक ममता जोशी, कांचन नागवेकर, उपतालुकाप्रमुख प्रवीण पांचाळ, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, शंकर सोनवडकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, विभागप्रमुख श्रीकृष्ण घाणेकर, उपविभागप्रमुख चंद्रकांत साळवी, शहर युवा अधिकारी अभिजीत दुडये, केतन शेट्ये उपस्थित होते.