शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी १० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या ...

रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या दिवशी १० जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ४४९ झाली आहे. २५५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ११,९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. आतापर्यंतच कोरोनाबाधितांची आजची ५५५ ही संख्या उच्चांकी ठरली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील ३४८ रुग्ण तर ॲन्टिजेन चाचणीतील २०७ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १६० रुग्ण, चिपळुणात १३१, दापोलीमध्ये २६, खेडमध्ये ७२, गुहागरात ५२, संगमेश्वरमध्ये ६१, मंडणगडात ९, लांजात २४, राजापुरात २० रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर १२.५ टक्के, तर बरे होण्याचा दर ७६.१९ टक्के आहे.

कोरोना मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३, चिपळूण दापोलीतील प्रत्येकी २ आणि रत्नागिरी, राजापूर, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि ६ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के आहे. गृहविलगीकरणात ११२४ रुग्ण असून वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांमध्ये २१४५ रुग्ण उपचार घेत आहेत.